शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

कुठे गेले कोट्यवधी रुपये? झटक्यात रिकामी झाली अनेक खाती, बँकेत जाताच लोकांना बसला धक्का  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 16:12 IST

सर्वसामान्य लोक आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी म्हणून बँकेत ठेवत असतात. मात्र गरजेवेळी हे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यावर तुमच्या ...

सर्वसामान्य लोक आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी म्हणून बँकेत ठेवत असतात. मात्र गरजेवेळी हे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यावर तुमच्या खात्यात पैसेच नाहीत, असं उत्तर मिळाल्यावर अशा गरीब गरजूंना बसणाऱ्या धक्क्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. काहीशी अशीच घटना बिहारमधील सीतामढी येथे घडली आहे.  

उत्तर बिहार ग्रामीण बँकेच्या बैरगनिया शाखेमध्ये जेव्हा लोक पैसे काढण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना त्यांची बँक खाती रिकामी असल्याचं कळालं. याबाबत समजल्यावर इतर लोकही आपला बॅलन्स तपासण्यासाठी बँकेत धाव घेऊ लागले. मात्र सगळ्यांनाच तुमच्या खात्यात पैसे नाही आहेत, असं उत्तर मिळालं. हे उत्तर ऐकून सर्वसामान्य ठेवीदारांच्या पायाखालची वाळूच सरकली.  

ही बातमी आजूबाजूच्या भागात वाऱ्यासारखी पसरली. बँकेत लोकांची गर्दी झाली. तणाव, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. एका खातेधारकाने सांगितलं की, त्याच्या घरात लग्न आहे. त्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून पैसे काढण्यासाठी बँकेत ये जा करत आहे. मात्र दररोज कॅशियरकडून सबबी दिल्या जात आहेत. कधी मशीन खराब असल्याचं सांगितलं जातंय, कधी लिंक फेल असल्याचं सांगतात. मात्र जेव्हा मी पासबूक अपडेट करण्यासाठी गेलो तेव्हा खात्यामध्ये ९ लाख रुपयांऐवजी केवळ ४३ हजार रुपयेच असल्याचे समोर आले.

आणखी एका खातेदाराने सांगितले की, त्याच्या खात्यामधून १५ लाख रुपये गायब आहेत. असेच अनेक खातेदार आहेत, ज्यांच्या खात्यांमधून त्यांच्या परवानशीविना पैसे काढण्यात आले आहेत. आता हे सर्व कॅशियर आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून  केल्याचा आरोप खातेदार करत आहेत.

मिळत असलेल्या माहितीनुसार या शाखेच्या वेगवेगळ्या खात्यांमधून सुमारे ५ कोटी रुपये गायब झाले आहेत. जेव्हा तणाव वाढला तेव्हा विभागीय व्यवस्थापक प्रभात कुमार बैरगनिया यांनी शाखेमध्ये धाव घेतली आणि लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यांनी तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. सध्या बँकेत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच लोकांना त्यांचे पैसे परत मिळतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.  

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकfraudधोकेबाजीBiharबिहार