शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कुठे गेले कोट्यवधी रुपये? झटक्यात रिकामी झाली अनेक खाती, बँकेत जाताच लोकांना बसला धक्का  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 16:12 IST

सर्वसामान्य लोक आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी म्हणून बँकेत ठेवत असतात. मात्र गरजेवेळी हे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यावर तुमच्या ...

सर्वसामान्य लोक आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी म्हणून बँकेत ठेवत असतात. मात्र गरजेवेळी हे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यावर तुमच्या खात्यात पैसेच नाहीत, असं उत्तर मिळाल्यावर अशा गरीब गरजूंना बसणाऱ्या धक्क्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. काहीशी अशीच घटना बिहारमधील सीतामढी येथे घडली आहे.  

उत्तर बिहार ग्रामीण बँकेच्या बैरगनिया शाखेमध्ये जेव्हा लोक पैसे काढण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना त्यांची बँक खाती रिकामी असल्याचं कळालं. याबाबत समजल्यावर इतर लोकही आपला बॅलन्स तपासण्यासाठी बँकेत धाव घेऊ लागले. मात्र सगळ्यांनाच तुमच्या खात्यात पैसे नाही आहेत, असं उत्तर मिळालं. हे उत्तर ऐकून सर्वसामान्य ठेवीदारांच्या पायाखालची वाळूच सरकली.  

ही बातमी आजूबाजूच्या भागात वाऱ्यासारखी पसरली. बँकेत लोकांची गर्दी झाली. तणाव, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. एका खातेधारकाने सांगितलं की, त्याच्या घरात लग्न आहे. त्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून पैसे काढण्यासाठी बँकेत ये जा करत आहे. मात्र दररोज कॅशियरकडून सबबी दिल्या जात आहेत. कधी मशीन खराब असल्याचं सांगितलं जातंय, कधी लिंक फेल असल्याचं सांगतात. मात्र जेव्हा मी पासबूक अपडेट करण्यासाठी गेलो तेव्हा खात्यामध्ये ९ लाख रुपयांऐवजी केवळ ४३ हजार रुपयेच असल्याचे समोर आले.

आणखी एका खातेदाराने सांगितले की, त्याच्या खात्यामधून १५ लाख रुपये गायब आहेत. असेच अनेक खातेदार आहेत, ज्यांच्या खात्यांमधून त्यांच्या परवानशीविना पैसे काढण्यात आले आहेत. आता हे सर्व कॅशियर आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून  केल्याचा आरोप खातेदार करत आहेत.

मिळत असलेल्या माहितीनुसार या शाखेच्या वेगवेगळ्या खात्यांमधून सुमारे ५ कोटी रुपये गायब झाले आहेत. जेव्हा तणाव वाढला तेव्हा विभागीय व्यवस्थापक प्रभात कुमार बैरगनिया यांनी शाखेमध्ये धाव घेतली आणि लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यांनी तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. सध्या बँकेत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच लोकांना त्यांचे पैसे परत मिळतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.  

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकfraudधोकेबाजीBiharबिहार