शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा परत कधी आणणार?

By admin | Updated: October 5, 2014 01:45 IST

याआधी कोणत्याच सरकारने काही केले नाही आणि आपले सरकार सत्तेत आल्यानंतरच सर्व काही करण्यात आले, असे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालविलेला आहे,

मेहाम (हरियाणा) : याआधी कोणत्याच सरकारने काही केले नाही आणि आपले सरकार सत्तेत आल्यानंतरच सर्व काही करण्यात आले, असे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालविलेला आहे, अशी परखड टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. सत्तेत आल्यानंतर विदेशात जमा असलेला काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मेहाम येथे काँग्रेसच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या. 
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जणू काहीही चांगले घडलेले नाही आणि आपण एका रात्रीत प्रत्येकाचे भविष्य उजळून टाकू, असे वातावरण ते निर्माण करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने त्यांनी एकतरी पाऊल उचलले आहे काय? महागाई कमी झाली काय? गरिबांना स्वस्त दरात भोजन मिळत आहेत काय? बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे काय? सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसांच्या आत विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याचे काय झाले? या दिशेने एखादे पाऊल तरी उचलले आहे काय? नक्कीच नाही.’
काँग्रेस सरकारने मागील दहा वर्षात केलेल्या विकासकामाच्या आधारावरच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी यावेळी केली. पूर्वीच्या संपुआ सरकारने आखलेल्या धोरणांचे श्रेय भाजपा स्वत:कडे घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. खोटय़ा आश्वासनांना बळी पडू नका. गतिशील विकासासाठी पुन्हा काँग्रेसचे सरकार यावे यासाठी शहाणपणाने मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)
 
च्मोदींवर प्रहार करताना सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, ‘रिकामे जहाज जास्तच गोंगाट करते. मोठय़ाने बोलता म्हणजे तुम्ही खरेच बोलता असे नव्हे.