शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

काळा पैसा परत कधी आणणार?

By admin | Updated: October 5, 2014 01:45 IST

याआधी कोणत्याच सरकारने काही केले नाही आणि आपले सरकार सत्तेत आल्यानंतरच सर्व काही करण्यात आले, असे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालविलेला आहे,

मेहाम (हरियाणा) : याआधी कोणत्याच सरकारने काही केले नाही आणि आपले सरकार सत्तेत आल्यानंतरच सर्व काही करण्यात आले, असे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालविलेला आहे, अशी परखड टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. सत्तेत आल्यानंतर विदेशात जमा असलेला काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मेहाम येथे काँग्रेसच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या. 
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जणू काहीही चांगले घडलेले नाही आणि आपण एका रात्रीत प्रत्येकाचे भविष्य उजळून टाकू, असे वातावरण ते निर्माण करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने त्यांनी एकतरी पाऊल उचलले आहे काय? महागाई कमी झाली काय? गरिबांना स्वस्त दरात भोजन मिळत आहेत काय? बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे काय? सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसांच्या आत विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याचे काय झाले? या दिशेने एखादे पाऊल तरी उचलले आहे काय? नक्कीच नाही.’
काँग्रेस सरकारने मागील दहा वर्षात केलेल्या विकासकामाच्या आधारावरच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी यावेळी केली. पूर्वीच्या संपुआ सरकारने आखलेल्या धोरणांचे श्रेय भाजपा स्वत:कडे घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. खोटय़ा आश्वासनांना बळी पडू नका. गतिशील विकासासाठी पुन्हा काँग्रेसचे सरकार यावे यासाठी शहाणपणाने मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)
 
च्मोदींवर प्रहार करताना सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, ‘रिकामे जहाज जास्तच गोंगाट करते. मोठय़ाने बोलता म्हणजे तुम्ही खरेच बोलता असे नव्हे.