शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

संपूर्ण देश सैन्यासोबत उभा; तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार? राहुल गांधींचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 19:05 IST

चिनी अतिक्रमणाच्या विषयावरून मोदींकडून देशाची दिशाभूल; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाची माहिती दिली. पूर्व लडाखमधील तणाव, चीनकडून सुरू असलेले घुसखोरीचे प्रयत्न याची माहिती सिंह यांनी लोकसभेच्या माध्यमातून देशाला दिली. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. 'चीनकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे,' अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर थेट निशाणा साधला.संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी चीनला फटकारलं; लडाख सीमेवरील संपूर्ण स्थिती लोकसभेत मांडली'मोदींनी चीनच्या अतिक्रमणावरून देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे. आपला देश कायम सैन्यासोबत उभा होता, आहे आणि राहील,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार आणि चीनकडून आपली जमीन कधी परत घेणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीदेखील ट्विटवरून पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर हल्ला चढवला. 'राजनाथजी, देश सैन्यासोबत एकजुटीनं उभा आहे. पण चीननं आपल्या जमिनीवर कब्जा करण्याचं धाडस केलंच कसं, याचं उत्तर द्या. मोदींनी चिनी घुसखोरीबद्दल दिशाभूल का केली? चीनला आपल्या जमिनीवरून कधी पळवून लावणार?,' असा सवाल त्यांनी विचारला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्र्यांनी सीमेवरील तणावाची माहिती लोकसभेला दिली. यानंतर काँग्रेस खासदारांनी चर्चेची मागणी करत सभात्याग केला. काँग्रेस खासदारांना राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारायचे होते. मात्र लोकसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारली. त्यामुळे काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. प्रमुख विषयांवर चर्चा करण्याची सदनाची परंपरा आहे. मात्र सरकारला प्रश्नांची भीती वाटते, अशा शब्दांत काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन सैनिकांची भेट घेतली. देश शूर सैनिकांच्या मागे उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला होता. मीसुद्धा लडाखला गेलो, सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि धाडस याचा प्रत्यय आला. कर्नल संतोषने मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असं राजनाथ सिंह म्हणाले.चीनशी युद्ध झाल्यास शिया मुसलमान भारतासाठी प्राण देण्यासही तयार; धर्मगुरुचं पंतप्रधानांना पत्रपारंपारिक सीमेबद्दल दोन्ही देशांचे वेगवेगळे अर्थ आहेत असा चीनचा दावा आहे. १९५०-६० च्या दशकात हे दोन्ही देश याबद्दल बोलत होते पण कोणताही तोडगा निघाला नाही. चीनने लडाखमधील काही जमीन फार पूर्वी ताब्यात घेतली होती, त्याव्यतिरिक्त पाकिस्तानने पीओकेमधील काही जमीनही चीनच्या ताब्यात दिली. ही एक मोठी समस्या आहे आणि त्याचे निराकरण शांततेने व वाटाघाटीने करायला हवे. सीमेवर शांतता राखणे महत्वाचे आहे. सध्या एलएसीसंदर्भात दोन्ही देशांचे वेगळे मत आहे. शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. १९८८ पासून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधात विकास झाला. द्विपक्षीय संबंधही विकसित होऊ शकतात आणि सीमादेखील तोडगा निघू शकतो, असा विश्वास भारताला आहे. तथापि, त्याचा द्विपक्षीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो असं ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहindia china faceoffभारत-चीन तणाव