शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गहू- तांदूळ महागणार! देशातील धान्याचा साठा पाच वर्षातील नीचांकी पातळीवर, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 15:09 IST

देशातील सरकारी गोदामांमधील अन्नधान्याचा साठा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनुदानावर अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या सरकारी यंत्रणेवर येत्या काही दिवसांत ताण येणार आहे.

नवी दिल्ली : देशातील सरकारी गोदामांमधील अन्नधान्याचा साठा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनुदानावर अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या सरकारी यंत्रणेवर येत्या काही दिवसांत ताण येणार आहे. शेतकर्‍यांनी अजुनही गव्हाची पेरणी केलेली नाही आणि पुढील पीक १५ मार्चनंतरच बाजारात येण्याची अपेक्षा आहे. 

रोजच्या वापरातील वस्तू, आणि भाजीपालांचे दर गगनाला भिडले आहेत. आता भारतीय अन्न महामंडळच्या अहवालानुसार, या हंगामातील हिवाळ्यात पेरणी केलेले गहू आणि तांदूळ दोन्ही पिके खराब झाली आहेत. त्यामुळे किंमती २२ महिन्यांच्या उच्चांकीवर पोहोचल्या आहेत.

 

कोट्यवधीची रोकड, सोने, दागदागिने, अधिकाऱ्यांच्या घरावरील EDच्या धाडीत सापडले घबाड

१ ऑक्टोबर रोजी सरकारी गोदामांमध्ये गहू आणि तांदळाचा एकूण साठा ५११.४ लाख टन होता. वर्षभरापूर्वी हा आकडा ८१६ लाख टन होता. देशात गहू आणि तांदळाच्या किमती वाढू नयेत आणि देशांतर्गत बाजारपेठेत त्यांचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठीच सरकारने गहू आणि तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

१ ऑक्टोबर रोजी सरकारी गोदामांमध्ये २२७.५ लाख टन गव्हाचा साठा होता. गेल्या ६ वर्षातील गव्हाच्या साठ्याची ही सर्वात कमी पातळी आहे. तर तांदळाचा साठा आवश्यक्तेपेक्षा जवळपास २.८ पट जास्त होता. सप्टेंबर २०२२ अन्नधान्य उत्पादनांचा महागाई दर ११.५३ टक्के होता. 

त्यामुळे आता पुन्हा गव्हाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवर बसणार आहे. गव्हाच्या आट्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील महागाईची आकडेवारी पाहिल्यास गहू आणि पिठाचा वार्षिक किरकोळ महागाई दर १७.४१ टक्क्यांवर गेल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांतील ही उच्चांकी आहे. 

टॅग्स :Inflationमहागाई