शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

PM Modi in Rajyasabha : काँग्रेस नसती तर काय झालं असतं, पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 12:55 IST

PM Narendra Modi Speech in Rajya Sabha : काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर बोचरी टीका केली. काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात जे काही झालं तर काँग्रेसने केलं, काँग्रेस नसती तर काय झालं असतं, असं इथे वारंवार बोललं गेलं. पण खरंच काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही घडलं नसतं. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस नसती तर देशाची लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहीली असता. काँग्रेस नसती तर देशात आणीबाणी लागली नसती. काँग्रेस नसती तर शीखांचा नरसंहार झाला नसता. काँग्रेस नसती तर काश्मिरी पंडितांचे पलायन झाले नसते. काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार नसता. काँग्रेस नसती तर जातीवाद नसता. काँग्रेस नसती तर अधिक विकास झाला असता, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधींनी मांडलेल्या फेडरल स्ट्रक्चरच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सभागृहात सांगण्यात आले की, काँग्रेसने भारताची पायाभरणी केली आणि भाजपाने त्यावर झेंडा लावला. काही लोकांना वाटते की, भारत १९४७ मध्ये निर्माण झाला. याच विचारामुळे अडचणी निर्माण झाल्या. ज्यांना ५० वर्षे काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी काहीच केलं नाही. १९७५ मध्ये लोकशाहीचा गळा आवळणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये. भारतीय लोकशाहीला घराणेशाही असलेल्या पक्षांपासून मोठा धोका आहे. जेव्हा एखाद्या पक्षामध्ये कुटुंब सर्वोच्च होते. तेव्हा त्या पक्षामध्ये सर्वप्रथम टॅलेंटचे नुकसान होते, असा टोला मोदींनी लगावला.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाCentral Governmentकेंद्र सरकार