शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

PM Modi in Rajyasabha : काँग्रेस नसती तर काय झालं असतं, पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 12:55 IST

PM Narendra Modi Speech in Rajya Sabha : काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर बोचरी टीका केली. काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात जे काही झालं तर काँग्रेसने केलं, काँग्रेस नसती तर काय झालं असतं, असं इथे वारंवार बोललं गेलं. पण खरंच काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही घडलं नसतं. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस नसती तर देशाची लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहीली असता. काँग्रेस नसती तर देशात आणीबाणी लागली नसती. काँग्रेस नसती तर शीखांचा नरसंहार झाला नसता. काँग्रेस नसती तर काश्मिरी पंडितांचे पलायन झाले नसते. काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार नसता. काँग्रेस नसती तर जातीवाद नसता. काँग्रेस नसती तर अधिक विकास झाला असता, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधींनी मांडलेल्या फेडरल स्ट्रक्चरच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सभागृहात सांगण्यात आले की, काँग्रेसने भारताची पायाभरणी केली आणि भाजपाने त्यावर झेंडा लावला. काही लोकांना वाटते की, भारत १९४७ मध्ये निर्माण झाला. याच विचारामुळे अडचणी निर्माण झाल्या. ज्यांना ५० वर्षे काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी काहीच केलं नाही. १९७५ मध्ये लोकशाहीचा गळा आवळणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये. भारतीय लोकशाहीला घराणेशाही असलेल्या पक्षांपासून मोठा धोका आहे. जेव्हा एखाद्या पक्षामध्ये कुटुंब सर्वोच्च होते. तेव्हा त्या पक्षामध्ये सर्वप्रथम टॅलेंटचे नुकसान होते, असा टोला मोदींनी लगावला.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाCentral Governmentकेंद्र सरकार