शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

एनआरसीबाहेरील १९ लाख लोकांचे काय करणार? पी. चिदम्बरम यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 01:23 IST

चिदम्बरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.

नवी दिल्ली : एनआरसी (नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन) प्रक्रियेचा परिणाम शेजारी देशावर होणार नाही, असा शब्द मोदी सरकारने बांगलादेशला दिला आहे, तर एनआरसीच्या बाहेर राहणाऱ्या १९ लाख लोकांचे सरकार काय करणार? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी मोदी सरकारला केला आहे.आयएनएक्स मीडिया प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या वतीने टष्ट्वीट केले आहे की, हे १९ लाख लोक कधीपर्यंत अनिश्चितता, चिंतेत राहणार आहेत आणि मानवी हक्कांपासून वंचित राहणार आहेत? जर एनआरसी कायदेशीर प्रक्रिया आहे, तर कायदेशीर प्रक्रियेनुसार त्या १९ लाख लोकांचे काय होणार ज्यांना अवैध नागरिक घोषित करण्यात आले आहे. जर बांगलादेशला असा विश्वास देण्यात आला आहे की, एनआरसी प्रक्रियेचा परिणाम बांगलादेशवर होणार नाही, तर भारत सरकार १९ लाख लोकांचे काय करणार? आम्ही महात्मा गांधी यांच्या मानवता सिद्धांताचा सोहळा साजरा करीत आहोत. अशावेळी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. चिदम्बरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम