शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

"आप" का क्या होगा?, पंजाबमध्ये फुटीच्या मार्गावर

By admin | Updated: April 28, 2017 12:04 IST

दिल्ली मनपा निवडणुकीत "आप"चा"झाडू"न दणदणीत पराभव झाल्यानंतर पार्टीतील अंतर्गत तक्रारी चव्हाट्यावर येऊ लागलेला असताना आता पंजाब येथे पक्षात बंडाळीचा धोका वर्तवण्यात येत आहे.

 ऑनलाइन लोकमत

चंदीगड, दि. 28 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा "झाडू"न दणदणीत पराभव झाल्यानंतर पार्टीतील अंतर्गत तक्रारी व संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागलेला असताना आता पंजाब येथे पक्षात बंडाळीचा धोका वर्तवण्यात येत आहे. 
या पार्श्वभूमीवर पंजाबमधील "आप"चे संयोजक गुरप्रीत सिंह घुग्गी यांनी तसा इशारा देत  पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. 
 
घुग्गी यांनी गुरुवारी सांगितले की, "सध्या सर्वांना एकत्र ठेवणे गरजेचं आहे". यावेळी त्यांनी विरोधकांकडून "आप"चे आमदार गळाला लावले जाण्याची शंकादेखील उपस्थित केली. ज्या प्रकारे "आप"कडून स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे ही नाराज लोकं पार्टीला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहेत, असे घुग्गी यांनी सांगितले. त्यामुळे पार्टीला धोरणांमध्ये तातडीने सुधारणा करणं आवश्यक आहे, असे मतदेखील घुग्गी यांनी मांडले आहे. 
 
यादरम्यान, पार्टीमध्ये फुट पडणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. पार्टीतील दोन नेत्यांनी काँग्रेससोबत मागील दरवाजाने संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, संबंधित नेत्यांनी हे वृत्त फेटाळून लावत, पक्षनेतृत्व आत्मचिंतन करुन योग्य ते बदल करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात "आप"मधील काही लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसंच पंजाबमधील पार्टीच्या नवीन प्रमुखाचीही घोषणा होऊ शकते. 
(आम आदमी पार्टीत राजीनामा सत्र)
दरम्यान,  दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या पराभवानंतर पार्टीमधील अनेक पदाधिका-यांनी आपले राजीनामे सुपुर्द केलेत.  दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे,  दिल्लीचे प्रभारी आशिष तलवार, पंजाबमधील पार्टीचे सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांच्यासहीत अन्य नेत्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपआपल्या पदाचा राजीनामा दिला. 
(आता केजरीवालांसमोर उरले "हे" चार पर्याय)
पंजाबमधील "आप"चे प्रभारी संजय सिंह, दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे असोत किंवा दुर्गेश पाठक ही सर्व नेतेमंडळी अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळील असल्याचे मानले जाते. या नेत्यांना पंजाब विधानसभा निवडणूक आणि दिल्लीतील मनपा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली होती.  मात्र या निवडणुकांमध्ये आपचा सुपडा साफ झाला.
(जनतेने केजरीवालांचा सल्ला ऐकला, मच्छरला नाही दिले मत - सोशल मीडिया)
यादरम्यान, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्यावर पंजाबमध्ये तिकीट वाटपाचा आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अरविंद केजरीवाल यांना या सर्व नेत्यांवर विश्वास होता. मात्र, दिल्ली मनपा निवडणुकीतील "आप"चा दणदणीत पराभव पाहता पार्टीतील वाद तसंच असंतोष टाळण्यासाठी आता आपमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.