शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

"आप" का क्या होगा?, पंजाबमध्ये फुटीच्या मार्गावर

By admin | Updated: April 28, 2017 12:04 IST

दिल्ली मनपा निवडणुकीत "आप"चा"झाडू"न दणदणीत पराभव झाल्यानंतर पार्टीतील अंतर्गत तक्रारी चव्हाट्यावर येऊ लागलेला असताना आता पंजाब येथे पक्षात बंडाळीचा धोका वर्तवण्यात येत आहे.

 ऑनलाइन लोकमत

चंदीगड, दि. 28 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा "झाडू"न दणदणीत पराभव झाल्यानंतर पार्टीतील अंतर्गत तक्रारी व संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागलेला असताना आता पंजाब येथे पक्षात बंडाळीचा धोका वर्तवण्यात येत आहे. 
या पार्श्वभूमीवर पंजाबमधील "आप"चे संयोजक गुरप्रीत सिंह घुग्गी यांनी तसा इशारा देत  पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. 
 
घुग्गी यांनी गुरुवारी सांगितले की, "सध्या सर्वांना एकत्र ठेवणे गरजेचं आहे". यावेळी त्यांनी विरोधकांकडून "आप"चे आमदार गळाला लावले जाण्याची शंकादेखील उपस्थित केली. ज्या प्रकारे "आप"कडून स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे ही नाराज लोकं पार्टीला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहेत, असे घुग्गी यांनी सांगितले. त्यामुळे पार्टीला धोरणांमध्ये तातडीने सुधारणा करणं आवश्यक आहे, असे मतदेखील घुग्गी यांनी मांडले आहे. 
 
यादरम्यान, पार्टीमध्ये फुट पडणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. पार्टीतील दोन नेत्यांनी काँग्रेससोबत मागील दरवाजाने संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, संबंधित नेत्यांनी हे वृत्त फेटाळून लावत, पक्षनेतृत्व आत्मचिंतन करुन योग्य ते बदल करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात "आप"मधील काही लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसंच पंजाबमधील पार्टीच्या नवीन प्रमुखाचीही घोषणा होऊ शकते. 
(आम आदमी पार्टीत राजीनामा सत्र)
दरम्यान,  दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या पराभवानंतर पार्टीमधील अनेक पदाधिका-यांनी आपले राजीनामे सुपुर्द केलेत.  दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे,  दिल्लीचे प्रभारी आशिष तलवार, पंजाबमधील पार्टीचे सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांच्यासहीत अन्य नेत्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपआपल्या पदाचा राजीनामा दिला. 
(आता केजरीवालांसमोर उरले "हे" चार पर्याय)
पंजाबमधील "आप"चे प्रभारी संजय सिंह, दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे असोत किंवा दुर्गेश पाठक ही सर्व नेतेमंडळी अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळील असल्याचे मानले जाते. या नेत्यांना पंजाब विधानसभा निवडणूक आणि दिल्लीतील मनपा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली होती.  मात्र या निवडणुकांमध्ये आपचा सुपडा साफ झाला.
(जनतेने केजरीवालांचा सल्ला ऐकला, मच्छरला नाही दिले मत - सोशल मीडिया)
यादरम्यान, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्यावर पंजाबमध्ये तिकीट वाटपाचा आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अरविंद केजरीवाल यांना या सर्व नेत्यांवर विश्वास होता. मात्र, दिल्ली मनपा निवडणुकीतील "आप"चा दणदणीत पराभव पाहता पार्टीतील वाद तसंच असंतोष टाळण्यासाठी आता आपमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.