शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापनेसाठी काय पावले उचलली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:52 IST

तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुडुचेरी यांच्यात कावेरी नदीच्या पाणी वाटपावर आम्ही दिलेल्या निवाड्याच्या अमलबजावणीसाठी कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याबाबत काय पावले

नवी दिल्ली : तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुडुचेरी यांच्यात कावेरी नदीच्या पाणी वाटपावर आम्ही दिलेल्या निवाड्याच्या अमलबजावणीसाठी कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याबाबत काय पावले उचलली याची माहिती ८ मे रोजी आम्हाला द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला सांगितले.कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर या विषयावर सुनावणी घ्यावी, कारण आराखडा योजना केंद्रीय मंत्रिमंडळासमोर संमतीसाठी ठेवायची आहे, असे केंद्र सरकारने न्यायालयाला मागील सुनावणीत सांगितले होते. त्यावर कावेरी व्यवस्थापन योजनेचा आराखडा तयार करून तीन मे रोजी सादर करावा, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले होते.अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी कर्नाटकात प्रचारात गुंतलेले असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळासमोर आराखडा संमतीसाठी सादर करता आलेला नाही. तमिळनाडूच्या वतीने वरिष्ठ वकील शेखर नाफडे यांनी बाजू मांडली. त्यांनी केंद्राच्या या मागणीला तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, हे म्हणजे संघराज्यवाद व कायद्याचे राज्य संपुष्टात आल्यासारखेच आहे. न्या़ डी. वाय. चंद्रचूड व ए. एम. खानविलकर यांचा खंडपीठाने प्रारंभी कर्नाटक सरकारला कावेरी नदीचे चार टीएमसी पाणी तमिळनाडूला आठ मेपर्यंत द्यावे, असे सांगितले होते. किती पाणी सोडले जाऊ शकते हे कळवा, असे म्हटले होते.