शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

संमेलन शुं छे? संमेलननगरीतच विद्यार्थी अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 03:46 IST

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ८३ वर्षांनंतर बडोद्याला पुन्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.

बडोदा साहित्यनगरी : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ८३ वर्षांनंतर बडोद्याला पुन्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. मात्र, बडोदा येथील साहित्यनगरी अशी ओळख असणाºया महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील विद्यार्थीच या मराठी साहित्य संमेलनापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येते आहे. शिवाय, बडोदेकरही या साहित्य संमेलनाच्या सोहळ्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.बडोद्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कारकीर्दीत १९०९, १९२१ आणि १९३४ अशी तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर २०१८मध्ये पुन्हा एकदा या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान बडोदेकरांना मिळाला आहे. मात्र, खुद्द संमेलननगरी असा थाट मिरवणाºया महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इतका भव्य सोहळा या नगरीत होत आहे, याची तसूभरही कल्पना नाही. याउलट, विद्यापीठातील स्थानिक महोत्सवामध्ये हे विद्यार्थी दंग झालेले दिसून आले. मुख्य म्हणजे, बडोदा स्थानक येथे उतरल्यापासून संमेलननगरी या मार्गात संमेलनाविषयीचे एकही होर्डिंग लावण्यात आलेले नाही.संमेलन सोहळ्याविषयी विद्यापीठातील विद्यार्थी दिव्यांग शाह याला विचारले असता तो म्हणाला की, ‘संमेलन शुं छे? इस बारे कुछ पता नही, पर हमारा डान्स का प्रोग्राम है; वो बढिया शुरू है। मराठी संमेलन के बारे मे हमे प्राध्यापकोने भी नही बताया।’ विद्यार्थी मौनी जुमेदार हिला विचारले असता, ‘संमेलन असा शब्द फक्त कानावर पडला. मात्र, हे संमेलन कसले, कशासाठी, कोणी आयोजित केले, याबाबत काहीच माहिती नाही.’आयोजक अपयशीसाहित्य संमेलननगरीत म्हणजेच विद्यापीठाच्या आवारात काही कार्यक्रम आयोजित होणाºया ठरावीक जागा सोडल्या, तर कुठेही संमेलनाचा उत्साह दिसून येत नाही. शिवाय, विद्यापीठ असो वा आयोजक, दोघेही साहित्य संमेलन तरुणाईपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन