शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

संमेलन शुं छे? संमेलननगरीतच विद्यार्थी अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 03:46 IST

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ८३ वर्षांनंतर बडोद्याला पुन्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.

बडोदा साहित्यनगरी : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ८३ वर्षांनंतर बडोद्याला पुन्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. मात्र, बडोदा येथील साहित्यनगरी अशी ओळख असणाºया महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील विद्यार्थीच या मराठी साहित्य संमेलनापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येते आहे. शिवाय, बडोदेकरही या साहित्य संमेलनाच्या सोहळ्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.बडोद्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कारकीर्दीत १९०९, १९२१ आणि १९३४ अशी तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर २०१८मध्ये पुन्हा एकदा या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान बडोदेकरांना मिळाला आहे. मात्र, खुद्द संमेलननगरी असा थाट मिरवणाºया महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इतका भव्य सोहळा या नगरीत होत आहे, याची तसूभरही कल्पना नाही. याउलट, विद्यापीठातील स्थानिक महोत्सवामध्ये हे विद्यार्थी दंग झालेले दिसून आले. मुख्य म्हणजे, बडोदा स्थानक येथे उतरल्यापासून संमेलननगरी या मार्गात संमेलनाविषयीचे एकही होर्डिंग लावण्यात आलेले नाही.संमेलन सोहळ्याविषयी विद्यापीठातील विद्यार्थी दिव्यांग शाह याला विचारले असता तो म्हणाला की, ‘संमेलन शुं छे? इस बारे कुछ पता नही, पर हमारा डान्स का प्रोग्राम है; वो बढिया शुरू है। मराठी संमेलन के बारे मे हमे प्राध्यापकोने भी नही बताया।’ विद्यार्थी मौनी जुमेदार हिला विचारले असता, ‘संमेलन असा शब्द फक्त कानावर पडला. मात्र, हे संमेलन कसले, कशासाठी, कोणी आयोजित केले, याबाबत काहीच माहिती नाही.’आयोजक अपयशीसाहित्य संमेलननगरीत म्हणजेच विद्यापीठाच्या आवारात काही कार्यक्रम आयोजित होणाºया ठरावीक जागा सोडल्या, तर कुठेही संमेलनाचा उत्साह दिसून येत नाही. शिवाय, विद्यापीठ असो वा आयोजक, दोघेही साहित्य संमेलन तरुणाईपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन