शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

'या' राज्यांना होणार श्री अन्न योजनेचा फायदा; तांदूळ आणि गहू पिकवणाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:03 IST

यंदा अर्थसंकल्प सादर करताना भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'श्री अन्न योजना' सुरू करण्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : केंद्र सरकार देशात भरड धान्याच्या लागवडीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी केंद्राने 'मिलेट मिशन' सुद्धा सुरू केले आहे. भरड धान्याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. यासोबतच पर्यावरणही स्वच्छ राहील. कारण भरड धान्याच्या लागवडीत फार कमी सिंचनाची गरज असते. यामध्ये कीटकनाशके आणि खतांचा वापरही नगण्य आहे, असे सरकारचे मत आहे. त्यामुळेच यंदा अर्थसंकल्प सादर करताना भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'श्री अन्न योजना' सुरू करण्याची घोषणा केली. तसेच, आता भरड धान्याला 'श्री अन्न' म्हणून ओळखले जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या घोषणेने महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण या राज्यांमध्ये सर्वाधिक भरड धान्याची लागवड केली जाते. अशा स्थितीत या राज्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, केंद्र सरकारच्या या घोषणेचा तांदूळ आणि गहू उत्पादक राज्यांना फारसा लाभ मिळण्याची शक्यता नाही. परंतु या सर्वांमध्ये सर्वात चांगली बातमी म्हणजे केंद्राने पुढील आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जामध्ये 11.11% ने वाढ करून 20 लाख कोटी रुपये केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे स्थानिक सावकारांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. आता शेतकरी बँकिंग माध्यमातून कृषी कर्ज घेऊ शकतील.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प हा भारताला बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न आहे, ज्याला तांदूळ आणि गव्हाचा आरोग्यदायी पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते, असे मत कृषी तज्ज्ञांचे आहे. दरम्यान, भारत 50.9  मिलियन टनपेक्षा जास्त बाजरीचे उत्पादन करतो, जे आशियातील उत्पादनाच्या 80 टक्के आणि जागतिक उत्पादनाच्या 20 टक्के आहे. भारतात बाजरीचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर 1,239 किलो आहे, तर जागतिक सरासरी 1,229 किलो आहे.

बाजरी हे प्रामुख्याने भारतातील खरीप पीक आहे, जे बहुतेक पावसावर अवलंबून असते. विशेष बाब म्हणजे भारतातील अल्पभूधारक शेतकरी, ज्यांच्याकडे पैसा कमी आहे, ते या पिकाची लागवड करतात. बाजरीला प्रोत्साहन देण्यासाठी एफएमच्या पुढाकारामुळे या शेतकऱ्यांना फायदा होईल, कारण क्षेत्र वाढेल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल, असे फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते यशवंत चिदिपोथू यांनी सांगितले.

पंजाबमध्ये बाजरी फारच कमी पिकतेभारतात बाजरीच्या नऊ जातींची लागवड केली जाते. एकट्या तामिळनाडूमध्ये किमान सात वाणांची लागवड केली जाते, तर कर्नाटकात किमान पाच वाणांची लागवड होते. पण पंजाबमधील अल्पभूधारक शेतकरी या अर्थसंकल्पावर खूश नाहीत. पंजाबमधील यंग फार्मर्स असोसिएशनचे सरचिटणीस भगवान दास म्हणाले की, यंदाच्या अर्थसंकल्पात पंजाबच्या छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी काहीही नाही. येथील शेतकरी तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन घेतात, ते बाजरीचे उत्पादन घेत नाहीत.

टॅग्स :agricultureशेतीEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसाय