शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता म्हणजे काय, त्याचे नियम कोणते? समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 12:00 IST

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच संपूर्ण देशात एकाच वेळी आचारसंहिता लागू होते. या अंतर्गत राजकीय पक्षांव्यतिरिक्त इतर लोकांवर अनेक निर्बंध आहेत.

देशात लोकसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी ३ वाजता निवडणुकीची घोषणा करणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत,याचे  पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे लागते. याशिवाय आचारसंहितेत अनेक निर्बंधांचा समावेश आहे, त्याचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग कठोर कारवाई करू शकते. उमेदवार अपात्रही होऊ शकतो.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रानेही मोठ्या प्रकल्पांना दिली मंजूरी; मध्यरात्री घेतले निर्णय

निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुका झाल्या तर ते संपूर्ण राज्याला लागू होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होते. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहते. या काळात अनेक अधिकार निवडणूक आयोगाच्या हातात जातात.

आचारसंहितेचे नियम काय असतात?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही. याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने, बंगले, विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा, पायाभरणी किंवा उद्घाटन होत नाही. याशिवाय कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक रॅलींमध्ये पैसा, धर्म, जात यांच्या नावावर मते मागणे पूर्णपणे निषिद्ध आहे. निवडणुकीशी कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

आचारसंहितेच्या काळात मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात सरकारी खर्चाच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई आहे. याशिवाय राजकारणी मंदिरे, मशिदी किंवा इतर प्रार्थनास्थळांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करु नये.

बॅनर लावण्यासाठी मालकाची परवानगी घेणे आवश्यक 

आचारसंहितेच्या नियमांनुसार मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार थांबतो. याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या जमिनीवर, इमारतीच्या किंवा जागेच्या भिंतींवर ध्वज किंवा बॅनर लावण्यासाठी मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदारांना दिलेल्या स्लिप्स साध्या कागदावर असल्याची खात्री राजकीय पक्षांना करावी लागते. त्यावर उमेदवाराचे कोणतेही चिन्ह किंवा नाव लिहिलेले नसावे. मतदारांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने बूथमध्ये प्रवेश करू नये. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक