शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता म्हणजे काय, त्याचे नियम कोणते? समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 12:00 IST

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच संपूर्ण देशात एकाच वेळी आचारसंहिता लागू होते. या अंतर्गत राजकीय पक्षांव्यतिरिक्त इतर लोकांवर अनेक निर्बंध आहेत.

देशात लोकसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी ३ वाजता निवडणुकीची घोषणा करणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत,याचे  पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे लागते. याशिवाय आचारसंहितेत अनेक निर्बंधांचा समावेश आहे, त्याचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग कठोर कारवाई करू शकते. उमेदवार अपात्रही होऊ शकतो.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रानेही मोठ्या प्रकल्पांना दिली मंजूरी; मध्यरात्री घेतले निर्णय

निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुका झाल्या तर ते संपूर्ण राज्याला लागू होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होते. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहते. या काळात अनेक अधिकार निवडणूक आयोगाच्या हातात जातात.

आचारसंहितेचे नियम काय असतात?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही. याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने, बंगले, विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा, पायाभरणी किंवा उद्घाटन होत नाही. याशिवाय कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक रॅलींमध्ये पैसा, धर्म, जात यांच्या नावावर मते मागणे पूर्णपणे निषिद्ध आहे. निवडणुकीशी कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

आचारसंहितेच्या काळात मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात सरकारी खर्चाच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई आहे. याशिवाय राजकारणी मंदिरे, मशिदी किंवा इतर प्रार्थनास्थळांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करु नये.

बॅनर लावण्यासाठी मालकाची परवानगी घेणे आवश्यक 

आचारसंहितेच्या नियमांनुसार मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार थांबतो. याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या जमिनीवर, इमारतीच्या किंवा जागेच्या भिंतींवर ध्वज किंवा बॅनर लावण्यासाठी मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदारांना दिलेल्या स्लिप्स साध्या कागदावर असल्याची खात्री राजकीय पक्षांना करावी लागते. त्यावर उमेदवाराचे कोणतेही चिन्ह किंवा नाव लिहिलेले नसावे. मतदारांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने बूथमध्ये प्रवेश करू नये. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक