शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

राष्ट्रीय पर्यटन धोरण काय आहे? ज्यावर सरकार खर्च करणार 1.42 लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 16:04 IST

tourism : महामारीचा फटका बसलेल्या देशांतर्गत पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन धोरणावर चर्चा झाली.

नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार आगामी अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रीय पर्यटन धोरण आणण्याच्या तयारीत आहे. ईशान्येकडील केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की, सरकार लवकरच ही योजना जाहीर करू शकते.

गेल्या काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत या प्रदेशाच्या विकासावर चर्चा झाली. महामारीचा फटका बसलेल्या देशांतर्गत पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन धोरणावर चर्चा झाली. रेड्डी म्हणाले, देशात पर्यटन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वे, रस्ते आणि हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत केली जाईल. सन 2025 पर्यंत 220 विमानतळ बांधण्याचा सरकारचा मानस आहे, त्यापैकी 66 विमानतळे बांधण्यात आली आहेत.

किती खर्चाची तयारी?रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील पर्यटन क्षेत्रांना जोडण्यासाठी रेल्वेवर 62 हजार कोटी रुपये आणि रस्ते जोडणीवर 80 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. गेल्या आठ वर्षांत 66 विमानतळे बांधली गेली असून येत्या तीन वर्षांत ही संख्या 220 पर्यंत नेण्याची तयारी आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारने पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी भरपूर काम केले असून सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. गुंतवणूक आणण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना सहाय्यक म्हणून काम करत आहे.

पत हमी योजनेचा कालावधीही वाढवलापर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकारने आपत्कालीन पत हमी योजनेचा कालावधीही वाढवला आहे. ही योजना कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आली होती, ज्याचा कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे. एवढेच नाही तर सरकारने पर्यटन क्षेत्रासाठी 50,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूदही केली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यटन क्षेत्रातील योजनांवर वेगाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

चार सर्किट उभारणारदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार चार सर्किट उभारण्याचे काम करत आहे. यामध्ये राम सर्किट, बुद्ध सर्किट, हिमालयन सर्किट आणि बीआर आंबेडकर सर्किट बांधण्यात येणार आहे. रेल्वे विभाग विशेष गाड्या चालवणार आहे, ज्या प्रवाशांना प्रसिद्ध मंदिरे, वारसा आणि धार्मिक स्थळांना भेट देतील. रेड्डी म्हणाले की, या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारला खाजगी क्षेत्राकडूनही गुंतवणूक आणि सहकार्य हवे आहे.

टॅग्स :tourismपर्यटन