शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पर्यटन धोरण काय आहे? ज्यावर सरकार खर्च करणार 1.42 लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 16:04 IST

tourism : महामारीचा फटका बसलेल्या देशांतर्गत पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन धोरणावर चर्चा झाली.

नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार आगामी अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रीय पर्यटन धोरण आणण्याच्या तयारीत आहे. ईशान्येकडील केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की, सरकार लवकरच ही योजना जाहीर करू शकते.

गेल्या काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत या प्रदेशाच्या विकासावर चर्चा झाली. महामारीचा फटका बसलेल्या देशांतर्गत पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन धोरणावर चर्चा झाली. रेड्डी म्हणाले, देशात पर्यटन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वे, रस्ते आणि हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत केली जाईल. सन 2025 पर्यंत 220 विमानतळ बांधण्याचा सरकारचा मानस आहे, त्यापैकी 66 विमानतळे बांधण्यात आली आहेत.

किती खर्चाची तयारी?रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील पर्यटन क्षेत्रांना जोडण्यासाठी रेल्वेवर 62 हजार कोटी रुपये आणि रस्ते जोडणीवर 80 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. गेल्या आठ वर्षांत 66 विमानतळे बांधली गेली असून येत्या तीन वर्षांत ही संख्या 220 पर्यंत नेण्याची तयारी आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारने पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी भरपूर काम केले असून सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. गुंतवणूक आणण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना सहाय्यक म्हणून काम करत आहे.

पत हमी योजनेचा कालावधीही वाढवलापर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकारने आपत्कालीन पत हमी योजनेचा कालावधीही वाढवला आहे. ही योजना कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आली होती, ज्याचा कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे. एवढेच नाही तर सरकारने पर्यटन क्षेत्रासाठी 50,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूदही केली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यटन क्षेत्रातील योजनांवर वेगाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

चार सर्किट उभारणारदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार चार सर्किट उभारण्याचे काम करत आहे. यामध्ये राम सर्किट, बुद्ध सर्किट, हिमालयन सर्किट आणि बीआर आंबेडकर सर्किट बांधण्यात येणार आहे. रेल्वे विभाग विशेष गाड्या चालवणार आहे, ज्या प्रवाशांना प्रसिद्ध मंदिरे, वारसा आणि धार्मिक स्थळांना भेट देतील. रेड्डी म्हणाले की, या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारला खाजगी क्षेत्राकडूनही गुंतवणूक आणि सहकार्य हवे आहे.

टॅग्स :tourismपर्यटन