शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"उत्तर प्रदेशात जे चाललंय ते खूप चुकीचे"; सरन्यायाधीशांनी पोलिसांवर ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 20:11 IST

सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

Supreme Court: भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी उत्तर प्रदेशातील कायद्याच्या गैरवापरावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रकारे एका सामान्य प्रकरणाचे गुन्ह्यात रूपांतर केले जात आहे त्यासाठी कायद्याचे नियम पूर्णपणे मोडले जात आहेत, असं सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले. सुप्रीम कोर्टात जामीनविषयक एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

हे कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन असल्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये जे काही चालले आहे ते चुकीचे आहे. दिवाणी खटल्यांचे रूपांतर फौजदारी खटल्यात दररोज होत आहे. हे मूर्खपणाचे लक्षण आहे. केवळ पैसे न देणे हा गुन्हा होऊ शकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये हे रोजच घडत आहे आणि हे विचित्र आहे. दिवाणी अधिकार क्षेत्रही आहे हे वकील विसरले आहेत, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी म्हटलं.

ग्रेटर नोएडामधील पैशांच्या व्यवहाराशी संबंधित चेक बाऊन्सच्या प्रकरणात पोलिसांनी दिवाणी प्रकरणाऐवजी फौजदारी खटला बनवून आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी पैसे घेऊन हे प्रकरण गुन्हेगारीचे बनवले, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. सरन्यायाधिशांनी या प्रकरणात कोणताही दंड ठोठावला नाही. मात्र जर असे कोणतेही प्रकरण आता आले तर आम्ही निश्चितपणे दंड आकारु असे सरन्यायाधीश म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात दोन आठवड्यांच्या आत उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक २०२४ च्या निर्णयाचे पालन करण्याबाबत त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करतील, असं म्हटलं. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याला दोन आठवड्यांच्या आत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागेल, ज्यामध्ये त्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले की नाही हे स्पष्ट करावे लागेल असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

हे आरोपपत्र सर्वोच्च न्यायालयाच्या २०२४ च्या निर्णयाविरुद्ध आहे, ज्यामध्ये स्पष्ट नियम देण्यात आले होते, असेही न्यायालयाने म्हटलं. न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना दोन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत ज्यामध्ये २०२४ च्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होत आहे हे स्पष्ट करावे लागेल. याशिवाय या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याला आरोपपत्रातील नियम का पाळले गेले नाहीत, याचे उत्तरही दोन आठवड्यांत द्यावे लागणार आहे.

दरम्यान, चेक बाऊन्सशी संबंधित कायद्याबाबत असलेल्या कलम १३८ अन्वये या प्रकरणातील कार्यवाही सुरूच राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मेपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात होणार आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस