शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य विधानसभा मुदतपूर्व विसर्जित झाल्या तर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 08:33 IST

‘एक देश, एक निवडणूक’ : राज्यांमध्ये सहमतीसाठी येणार ब्लू प्रिंट

संजय शर्मा

नवी दिल्ली : एक देश, एक निवडणुकीसाठी १२ पेक्षा जास्त घटना दुरुस्त्यांची यादी तयार केली जात आहे. राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित करण्याच्या मुद्द्यावर राज्यांची सहमती मिळवण्याचा प्रयत्न समिती करेल, असे समजते.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील एक देश, एक निवडणूक समितीच्या बैठकीत शनिवारी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यासंबंधीचे विधेयक लागू करण्यासाठी एक डझनापेक्षा अधिक घटना दुरुस्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था मुदतपूर्व विसर्जित करण्यात आल्या, तर अशा स्थितीत कोणत्या प्रकारची तरतूद करावी लागेल, या मुद्द्यावर समितीच्या सदस्यांना राज्यांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद आदी उपस्थित होते.

सर्वांत जास्त अडचण कोणत्या विषयाची?सर्वांत जास्त अडचणीचा मुद्दा राज्यांच्या विधानसभांबाबत समोर येत आहे. राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ निश्चित कसा करावा? एखादे सरकार कधीही पडते किंवा विधानसभा विसर्जित झाली, तर उर्वरित कालावधीसाठी राज्यपाल हेच सरकार चालवतील की कसे, अशा सर्व मुद्द्यांवर राज्यांशीही चर्चा करून सहमतीचा मार्ग काढण्यात येणार आहे.

काय चिंता व्यक्त केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी?n ‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये ८०व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत जाहीर भाष्य केले होते. n मोदी यांनी तेव्हा म्हटले होते की, ‘एक देश, एक निवडणूक’ हा निव्वळ चर्चेचा विषय नसून भारताची गरज आहे. प्रत्येक महिन्यात देशात कुठे ना कुठे निवडणूक सुरू असते. त्यामुळे विकासकार्यावर परिणाम होतो.’

१९५२ ते १९६७ होत होत्या एकत्रच निवडणुकाn १९५२ पासून १९६७ पर्यंत देशात एकत्रच निवडणुका होत होत्या. त्यात लोकसभा व विधानसभांसाठी जनता आपले प्रतिनिधी एकाच वेळी निवडत होती. n त्यानंतर सरकारे मध्येच कोसळण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून वेगवेगळ्या निवडणुका होऊ लागल्या.n विशेष म्हणजे देशात प्रत्येक सहा महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीमुळे देशाला दर पाच वर्षांनी १० लाख कोटी रुपयांचा फटका बसतो. यामुळे विकासकामे प्रभावित होतात. n सत्तेत आल्यावर प्रत्येक राजकीय पक्ष खुर्ची वाचवण्यासाठी कोणताही समझोता करण्यास तयार होतात. या सर्वांत जनता भरडली जाते. वरून महागाईचा बडगा पडतो आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकOne Nation One Electionवन नेशन वन इलेक्शन