शहरं
Join us  
Trending Stories
1
"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत
2
'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
3
फक्त एका कुपनच्या जोरावर जगाला लुटणारा 'महाठग'; आजही त्याच मॉडेलवर चालतात मोठमोठे स्कॅम
4
"मी राजसाहेबांना डायरेक्ट बोललो, याला तिकीट देऊ नका, कारण..."; आमदार महेश सावंतांचा गंभीर दावा
5
फक्त तेलच नाही, तर व्हेनेजुएलात दडलाय सोन्या-चांदीचा मोठा खजिना; ट्रम्प यांचा त्यावर डोळा...
6
Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
7
अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 
8
"आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका"; 'बिनविरोध'च्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका
9
धूम-३ स्टाईल चोरी, एक बसायचा दुकानात, दुसरा करायचा चोऱ्या, जुळ्या भावांचा प्रताप, पोलीसही अवाक्, अखेरीस...  
10
Beed Crime: बीडमध्ये खड्डा खोदणाऱ्या कामगाराची गोळ्या घालून हत्या, शहरात खळबळ 
11
७ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या गर्भवती पत्नीला संपवलं; पुरावे नष्ट करण्यासाठी घरामागेच अंत्यसंस्कार
12
Video: रोहित शर्माशी चाहत्यांचे गैरवर्तन; भररस्त्यात कारमधूनच 'हिटमॅन'ने घेतली फॅनची शाळा
13
फक्त १ वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड घेताय? थांबा! राधिका गुप्ता यांनी सांगितला गुंतवणुकीचा 'सुरक्षित' मंत्र
14
छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते; गुजरातच्या भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान
15
"तुमको मिर्ची लगी तो मै क्या करूं..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
16
टाटा-रिलायन्सला धक्का! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे १.३५ लाख कोटी स्वाहा!
17
२१ वर्षीय युवक होता अनेक दिवस बेपत्ता; 'इन्स्टाग्राम'वरील मैत्रिण निघाली ४० वर्षीय विधवा, मग...
18
Municipal elections 2026: मतदाराला चार मते द्यावीच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'? 
19
’मनपा निवडणुकांतही काँग्रेसचा झंझावात दिसेल; भाजपा, महायुतीच्या हुकूमशाहीला धडा शिकवा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन      
20
"अजून ७० हजार कोटींचा निकाल लागलेला नाही, आम्ही मागची पानं चाळली तर त्यांना...", अजित पवारांना बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांमध्ये नेमकं होतं काय?... जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 10:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला होता, असं मोदी यांनी सांगितलं.

नेमकं तीन कृषी कायद्यात काय होतं?-

१. पहिला कायदा- शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020

हा कायदा कृषीमालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतो. यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत -

  • कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री.
  • इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे.
  • कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे.
  • मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे.

२. दुसरा कायदा - शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020

हा कायदा कंत्राटी शेतीबद्दल बोलतो. शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्याही काही प्रमाणात अशाप्रकारची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.

  • आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल.
  • 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होईल.
  • बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही त्यांच्या कंत्राटदारांवर राहील.
  • मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात.

३. तिसरा कायदा - अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020

अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक हा तिसरा आहे, ज्यावरून वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला.

  • डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणे. यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत. 
  • निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल.
  • किमती स्थिर राहण्यात मदत होईल. ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा.

मी देशवासियांची मनापासून क्षमा मागतो- नरेंद्र मोदी

इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची मनापासून क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलनAgriculture Sectorशेती क्षेत्रCentral Governmentकेंद्र सरकार