शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

ेसुरेशदादांविषयी बोलणारे खडसे पाणी योजनांबाबत गप्प का? गुलाबराव पाटील : पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय आरोपींमध्ये असल्याने गूपचिळी

By admin | Updated: November 26, 2015 23:57 IST

जळगाव- सोनवद, वाघळूद खुर्द, आव्हाणे अशा गुर्जरबहुल अनेक गावांमध्ये भाजपाचे पी.सी.पाटील यांनी पाणी योजना आणल्या. त्यात चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याने चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. पण या प्रकरणी जि.प.ने अधिकार्‍यांवर कारवाई केली नाही. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना गुन्हे दाखल करूनही अटक केली नाही. या प्रकरणातील आरोपी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंचे निकटवर्तीय आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यांचा बचाव सर्व यंत्रणांनी केला, असा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

जळगाव- सोनवद, वाघळूद खुर्द, आव्हाणे अशा गुर्जरबहुल अनेक गावांमध्ये भाजपाचे पी.सी.पाटील यांनी पाणी योजना आणल्या. त्यात चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याने चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. पण या प्रकरणी जि.प.ने अधिकार्‍यांवर कारवाई केली नाही. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना गुन्हे दाखल करूनही अटक केली नाही. या प्रकरणातील आरोपी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंचे निकटवर्तीय आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यांचा बचाव सर्व यंत्रणांनी केला, असा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
सुरेशदादांच्या मुद्द्यावर एकनाथराव खडसेंनी विधानसभेपासून अनेक सभांमध्ये आगपाखड केली. आता तर पाणी योजनांमध्ये अपहार झाल्याचे उखड झाले आहे. कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला, पण ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. आता खडसे याबाबत बोलतील का, सुरेशदादांविषयी खडसे कसे गावोगावी जाऊन बोलत होते, आरोप करीत होते, असा प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आरोपी पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय
अस्तित्वात नसलेल्या दुकानातून पाणी योजनेचे साहित्य खरेदी झाल्याचे दाखविले गेले. चौकशीत हा प्रकार उघड झाला. एवढा मोठा भ्रष्टाचार झाला. या प्रकरणात एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय पी.सी.पाटील यांचे बंधू सुभाष पाटील, हिरालाल पाटील हे आरोपी आहेत. त्यांचा बचाव करण्यात आला. खडसेंचे निकटवर्तीय आरोपी असल्याने ना पोलिसांनी कारवाई केली ना जिल्हा परिषदेने दोषींविरुद्ध वसुली केली, असेही आमदार पाटील म्हणाले.

या प्रकरणातील आरोपी जि.प.चे तत्कालीन कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघ आणि सहायक कार्यकारी अभियंता सुधीर डहाके यांचे जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, पण पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. आव्हाणीचे उपसरपंच रमेश माणिक पाटील यांनी स्वत: खर्च करून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले. एक तक्रारदार न्यायालयात आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी फिरतो, पण त्याला न्याय मिळत नाही ही बाब यंत्रणांसाठी लाजीरवाणी आहे. मोठ्या पुढार्‍यांच्या बगलबच्च्यांनी मोठा डल्ला मारावा आणि मोकळे व्हावे. त्यांचे कुणीच काहीच वाकडे करू शकत नाही, असा चुकीचा संदेश यानिमित्त गेला आहे.
तीन बैठकांमध्ये प्रश्न मांडला, आता विधानसभेत बोलेल
मी मागील तीन डीपीडीसीच्या बैठकांमध्ये कल्याणेहोळ, सोनवद खुर्द, वाघळूद व इतर पाणी योजनांप्रकरणी कारवाईची मागणी करीत आहे. पण त्याची दखल प्रशासन, पालकमंत्री घेत नाही. याला काय म्हणावे? पुढे विधानसभेत हाप्रश्नमांडेल,असेहीपाटीलम्हणाले.