शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

ेसुरेशदादांविषयी बोलणारे खडसे पाणी योजनांबाबत गप्प का? गुलाबराव पाटील : पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय आरोपींमध्ये असल्याने गूपचिळी

By admin | Updated: November 26, 2015 23:57 IST

जळगाव- सोनवद, वाघळूद खुर्द, आव्हाणे अशा गुर्जरबहुल अनेक गावांमध्ये भाजपाचे पी.सी.पाटील यांनी पाणी योजना आणल्या. त्यात चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याने चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. पण या प्रकरणी जि.प.ने अधिकार्‍यांवर कारवाई केली नाही. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना गुन्हे दाखल करूनही अटक केली नाही. या प्रकरणातील आरोपी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंचे निकटवर्तीय आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यांचा बचाव सर्व यंत्रणांनी केला, असा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

जळगाव- सोनवद, वाघळूद खुर्द, आव्हाणे अशा गुर्जरबहुल अनेक गावांमध्ये भाजपाचे पी.सी.पाटील यांनी पाणी योजना आणल्या. त्यात चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याने चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. पण या प्रकरणी जि.प.ने अधिकार्‍यांवर कारवाई केली नाही. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना गुन्हे दाखल करूनही अटक केली नाही. या प्रकरणातील आरोपी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंचे निकटवर्तीय आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यांचा बचाव सर्व यंत्रणांनी केला, असा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
सुरेशदादांच्या मुद्द्यावर एकनाथराव खडसेंनी विधानसभेपासून अनेक सभांमध्ये आगपाखड केली. आता तर पाणी योजनांमध्ये अपहार झाल्याचे उखड झाले आहे. कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला, पण ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. आता खडसे याबाबत बोलतील का, सुरेशदादांविषयी खडसे कसे गावोगावी जाऊन बोलत होते, आरोप करीत होते, असा प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आरोपी पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय
अस्तित्वात नसलेल्या दुकानातून पाणी योजनेचे साहित्य खरेदी झाल्याचे दाखविले गेले. चौकशीत हा प्रकार उघड झाला. एवढा मोठा भ्रष्टाचार झाला. या प्रकरणात एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय पी.सी.पाटील यांचे बंधू सुभाष पाटील, हिरालाल पाटील हे आरोपी आहेत. त्यांचा बचाव करण्यात आला. खडसेंचे निकटवर्तीय आरोपी असल्याने ना पोलिसांनी कारवाई केली ना जिल्हा परिषदेने दोषींविरुद्ध वसुली केली, असेही आमदार पाटील म्हणाले.

या प्रकरणातील आरोपी जि.प.चे तत्कालीन कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघ आणि सहायक कार्यकारी अभियंता सुधीर डहाके यांचे जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, पण पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. आव्हाणीचे उपसरपंच रमेश माणिक पाटील यांनी स्वत: खर्च करून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले. एक तक्रारदार न्यायालयात आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी फिरतो, पण त्याला न्याय मिळत नाही ही बाब यंत्रणांसाठी लाजीरवाणी आहे. मोठ्या पुढार्‍यांच्या बगलबच्च्यांनी मोठा डल्ला मारावा आणि मोकळे व्हावे. त्यांचे कुणीच काहीच वाकडे करू शकत नाही, असा चुकीचा संदेश यानिमित्त गेला आहे.
तीन बैठकांमध्ये प्रश्न मांडला, आता विधानसभेत बोलेल
मी मागील तीन डीपीडीसीच्या बैठकांमध्ये कल्याणेहोळ, सोनवद खुर्द, वाघळूद व इतर पाणी योजनांप्रकरणी कारवाईची मागणी करीत आहे. पण त्याची दखल प्रशासन, पालकमंत्री घेत नाही. याला काय म्हणावे? पुढे विधानसभेत हाप्रश्नमांडेल,असेहीपाटीलम्हणाले.