शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या परदेश दौ-यांतून भारताला काय मिळाले? आनंद शर्मांची राज्यसभेत घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:50 IST

पंतप्रधान मोदींनी ६५ देशांचे दौरे केले. अमेरिकेला ५ वेळा गेले. भारताला त्याचा काही लाभ झाला का? या दौºयानंतर भारताच्या पदरात नेमके काय पडले ते पंतप्रधानांनी सभागृहाला सांगितले नाही.

सुरेश भटेवरा।नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी ६५ देशांचे दौरे केले. अमेरिकेला ५ वेळा गेले. भारताला त्याचा काही लाभ झाला का? या दौºयानंतर भारताच्या पदरात नेमके काय पडले ते पंतप्रधानांनी सभागृहाला सांगितले नाही. देशहितासाठी विरोधक कायमच सरकारच्या पाठीशी उभे राहतात; पण शेजारी राष्ट्रांशी सुसंवाद नसेल, तर देश मजबूत बनू शकणार नाही,अशा शब्दांत काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी पंतप्रधानांवर टीका केली.परराष्ट्र धोरणाविषयी राज्यसभेतील चर्चेत आनंद शर्मा बोलत होते. पंतप्रधान मोदी त्यापूर्वी सभागृहात उपस्थित होते. मात्र, चर्चेला सुरुवात झाल्यावर ते निघून गेल्याने विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, महत्त्वपूर्ण चर्चेच्या वेळी पंतप्रधान सभागृहात असायला हवेत, आम्हाला त्यांचे म्हणणे ऐकायचे आहे. त्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, सर्वांच्या प्रश्नांची मी उत्तरे देईन. त्यासाठी पंतप्रधानांची आवश्यकता नाही.शर्मा म्हणाले की, भारताच्या ताकदीचा अंदाज सर्जिकल स्ट्राइक्समुळे आला, असा जगाला अंदाज आला की नाही, याची कल्पना नाही. मात्र, भारताच्या शेजारी राष्ट्रांनाही हा दावा मान्य नाही. असा एकही दिवस नाही की सीमेवर भारताचा जवान शहीद होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडले आहे, अशी भाषा कशासाठी? भारताला महाशक्ती बनायचे असेल तर ही भाषा योग्य नाही.१९७१ सालचे युद्ध जिंकल्यानंतरही इंदिरा गांधींनी ही भाषा केली नव्हती. तुम्ही स्व. इंदिरा गांधींच्या नावाचा उल्लेख करणार नाही. मात्र, देशाचा गौरवशाली इतिहास बदलता येणार नाही.पाकबाबत सरकारच्या धोरणात स्पष्टता नाही, असे नमूद करीत शर्मा म्हणाले, अफगाणिस्तानच्या नाटकीय दौºयानंतर पंतप्रधान अचानक लाहोरला गेले. त्यांना तिथे गार्ड आॅफ आॅनर मिळाला नाही; पण पठाणकोटच्या हल्ल्याची भेट मात्र मिळाली. बांगलादेश युद्धानंतर भारत व पाककडे जग वेगळ्या नजरेने पाहत होते. आता एकाच मापाने दोन्ही देशांना सारे देश मोजतात. सरकार पाकशी कधी चर्चा करते, तर कधी चर्चेला विराम दिला जातो. गेल्या ३ वर्षांत पाकिस्तानशी तुमचे काय बोलणे झाले, एकदा हे स्पष्ट का करीत नाही?चीन व भारत तणावाचा उल्लेख करीत आनंद शर्मा म्हणाले, पाकिस्तानात ग्वादर, श्रीलंकेत कोलंबोसह हंबनटोटा बंदरे चीन विकसित करीत आहे. चीनचा वन बेल्ट वन रोड भारताच्या अखंडतेच्या विरोधात आहे. या रोडद्वारे चीनने शेजारी राष्ट्रांना जोडले आहे. रशियाने कायम भारताची साथ दिली. आज ही मैत्री कमजोर झाली आहे. भारत नेपाळ संबंध दुरावले आहेत. इस्रायलप्रमाणे पॅलेस्टाईनशीही संबंध आवश्यक आहेत. शेजारी राष्ट्रांसह सर्वांशी भारताने सौहार्दाचे संबंध स्थापित करणे आवश्यक आहे.बोलण्याच्या ओघात शर्मा म्हणाले की, पंतप्रधान कोणत्याही देशात गेले तर विमानातून ते एकटे उतरतात. कॅमेºयाच्या फ्रेममधे अन्य कोणी येऊ नये, याची पुरेपूर दक्षता घेतात.परदेश दौरे एकट्यानेच करणे पंतप्रधानांना आवडते. आपल्याबरोबर ते कोणाला नेत नाहीत. काही वेळा आवडत नसूनही अन्य मंत्र्यांना नेणे गरजेचे असते.कोणीच मित्र नाही : यादवएकही देश आजमितीला भारताचा मित्र नाही, हे ऐकले तरी संताप येतो. जगाशी आपला संपर्क जरुर असावा. मात्र, शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध नकोत काय? भारताचे नेपाळशी संबंध दुरावले आहेत. भारत आणि रशियाच्या मैत्रीतही अंतर पडले आहे.सिक्किम भारतात कधी विलीन झाला हे जगाला कळलेच नाही. इंदिराजींनी हे चातुर्य दाखवले होते. आज कुठे नेऊ न ठेवलाय देश? आपला मित्र देश नेमका कोण? असा मला प्रश्न पडला आहे, असे शरद यादव म्हणाले.भाजपाचे विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, निवडक प्रसंगांवरून भारताच्या परराष्ट्र धोरणाची चिकित्सा करणे योग्य नाही. परराष्ट्रांशी संबंध हे पिकांसारखे असतात. पेरणी केल्यानंतर त्याचे पीक यायला काही वेळ लागतो.