शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

मोदींच्या परदेश दौ-यांतून भारताला काय मिळाले? आनंद शर्मांची राज्यसभेत घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:50 IST

पंतप्रधान मोदींनी ६५ देशांचे दौरे केले. अमेरिकेला ५ वेळा गेले. भारताला त्याचा काही लाभ झाला का? या दौºयानंतर भारताच्या पदरात नेमके काय पडले ते पंतप्रधानांनी सभागृहाला सांगितले नाही.

सुरेश भटेवरा।नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी ६५ देशांचे दौरे केले. अमेरिकेला ५ वेळा गेले. भारताला त्याचा काही लाभ झाला का? या दौºयानंतर भारताच्या पदरात नेमके काय पडले ते पंतप्रधानांनी सभागृहाला सांगितले नाही. देशहितासाठी विरोधक कायमच सरकारच्या पाठीशी उभे राहतात; पण शेजारी राष्ट्रांशी सुसंवाद नसेल, तर देश मजबूत बनू शकणार नाही,अशा शब्दांत काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी पंतप्रधानांवर टीका केली.परराष्ट्र धोरणाविषयी राज्यसभेतील चर्चेत आनंद शर्मा बोलत होते. पंतप्रधान मोदी त्यापूर्वी सभागृहात उपस्थित होते. मात्र, चर्चेला सुरुवात झाल्यावर ते निघून गेल्याने विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, महत्त्वपूर्ण चर्चेच्या वेळी पंतप्रधान सभागृहात असायला हवेत, आम्हाला त्यांचे म्हणणे ऐकायचे आहे. त्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, सर्वांच्या प्रश्नांची मी उत्तरे देईन. त्यासाठी पंतप्रधानांची आवश्यकता नाही.शर्मा म्हणाले की, भारताच्या ताकदीचा अंदाज सर्जिकल स्ट्राइक्समुळे आला, असा जगाला अंदाज आला की नाही, याची कल्पना नाही. मात्र, भारताच्या शेजारी राष्ट्रांनाही हा दावा मान्य नाही. असा एकही दिवस नाही की सीमेवर भारताचा जवान शहीद होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडले आहे, अशी भाषा कशासाठी? भारताला महाशक्ती बनायचे असेल तर ही भाषा योग्य नाही.१९७१ सालचे युद्ध जिंकल्यानंतरही इंदिरा गांधींनी ही भाषा केली नव्हती. तुम्ही स्व. इंदिरा गांधींच्या नावाचा उल्लेख करणार नाही. मात्र, देशाचा गौरवशाली इतिहास बदलता येणार नाही.पाकबाबत सरकारच्या धोरणात स्पष्टता नाही, असे नमूद करीत शर्मा म्हणाले, अफगाणिस्तानच्या नाटकीय दौºयानंतर पंतप्रधान अचानक लाहोरला गेले. त्यांना तिथे गार्ड आॅफ आॅनर मिळाला नाही; पण पठाणकोटच्या हल्ल्याची भेट मात्र मिळाली. बांगलादेश युद्धानंतर भारत व पाककडे जग वेगळ्या नजरेने पाहत होते. आता एकाच मापाने दोन्ही देशांना सारे देश मोजतात. सरकार पाकशी कधी चर्चा करते, तर कधी चर्चेला विराम दिला जातो. गेल्या ३ वर्षांत पाकिस्तानशी तुमचे काय बोलणे झाले, एकदा हे स्पष्ट का करीत नाही?चीन व भारत तणावाचा उल्लेख करीत आनंद शर्मा म्हणाले, पाकिस्तानात ग्वादर, श्रीलंकेत कोलंबोसह हंबनटोटा बंदरे चीन विकसित करीत आहे. चीनचा वन बेल्ट वन रोड भारताच्या अखंडतेच्या विरोधात आहे. या रोडद्वारे चीनने शेजारी राष्ट्रांना जोडले आहे. रशियाने कायम भारताची साथ दिली. आज ही मैत्री कमजोर झाली आहे. भारत नेपाळ संबंध दुरावले आहेत. इस्रायलप्रमाणे पॅलेस्टाईनशीही संबंध आवश्यक आहेत. शेजारी राष्ट्रांसह सर्वांशी भारताने सौहार्दाचे संबंध स्थापित करणे आवश्यक आहे.बोलण्याच्या ओघात शर्मा म्हणाले की, पंतप्रधान कोणत्याही देशात गेले तर विमानातून ते एकटे उतरतात. कॅमेºयाच्या फ्रेममधे अन्य कोणी येऊ नये, याची पुरेपूर दक्षता घेतात.परदेश दौरे एकट्यानेच करणे पंतप्रधानांना आवडते. आपल्याबरोबर ते कोणाला नेत नाहीत. काही वेळा आवडत नसूनही अन्य मंत्र्यांना नेणे गरजेचे असते.कोणीच मित्र नाही : यादवएकही देश आजमितीला भारताचा मित्र नाही, हे ऐकले तरी संताप येतो. जगाशी आपला संपर्क जरुर असावा. मात्र, शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध नकोत काय? भारताचे नेपाळशी संबंध दुरावले आहेत. भारत आणि रशियाच्या मैत्रीतही अंतर पडले आहे.सिक्किम भारतात कधी विलीन झाला हे जगाला कळलेच नाही. इंदिराजींनी हे चातुर्य दाखवले होते. आज कुठे नेऊ न ठेवलाय देश? आपला मित्र देश नेमका कोण? असा मला प्रश्न पडला आहे, असे शरद यादव म्हणाले.भाजपाचे विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, निवडक प्रसंगांवरून भारताच्या परराष्ट्र धोरणाची चिकित्सा करणे योग्य नाही. परराष्ट्रांशी संबंध हे पिकांसारखे असतात. पेरणी केल्यानंतर त्याचे पीक यायला काही वेळ लागतो.