शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

विधानसभा अध्यक्षांनी शुभेंदु अधिकारी यांचा राजीनामा नाकारला; म्हणाले, "फॉर्मेट योग्य नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 18:53 IST

suvendu adhikari : पश्चिम बंगालच्या ममता सरकारमध्ये मंत्री असलेले शुभेंदु अधिकारी यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्व पदाचा राजीनामा दिला.

ठळक मुद्देशुभेंदु अधिकारी हे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज होते.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी शुभेंदू अधिकारी यांचा राजीनामा नाकारला आहे. राजीनामा योग्य स्वरुपात (फॉर्मेट) नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, शुभेंदू अधिकारी यांना २१ डिसेंबरला स्वत: येऊन  राजीनामा द्यावा लागेल, असे अध्यक्षांनी  सांगितले आहे.

पश्चिम बंगालच्या ममता सरकारमध्ये मंत्री असलेले शुभेंदु अधिकारी यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्व पदाचा राजीनामा दिला. त्याआधी बुधवारी शुभेंदू अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान, शुभेंदु अधिकारी लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शुभेंदु अधिकारी हे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज होते. टीएमसीकडून त्यांना समजावण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र त्यांनी अखेर टीएमसी सोडण्याचा निर्णय घेतला होता. टीएमसीमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पश्चिम बंगालमधील 65 विधानसभा जागांवर अधिकारी कुटुंबाची मजबूत पकड आहे. या जागा राज्यातील सहा जिल्ह्यात पसरलेल्या आहेत.

शुभेंदु अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर टीएमसीचे आमदार जितेंद्र तिवारी यांनीही पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जितेंद्र तिवारी हे सध्या पांडेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. शुभेंदु अधिकारी आणि जितेंद्र तिवारी यांचे राजीनामे ममता बॅनर्जींच्या टीएमसीमधील वाढत्या बंडखोरीकडे इशारा करीत आहेत.

शुभेंदू अधिकारी यांच्या प्रभावाखाली असलेल्या जागांची संख्या राज्यातील एकूण 294 जागांपैकी पाचपेक्षा जास्त आहेत. शुभेंदु अधिकारी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे 1982 मध्ये कांथी दक्षिणमधून काँग्रेसचे आमदार होते. मात्र, नंतर ते तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक झाले.

शुभेंदु अधिकारी 2009 पासून कांथी मतदारसंघातून तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2007 मध्ये शुभेंदु अधिकारी यांनी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये इंडोनेशियन रसायन कंपनीविरूद्ध भूसंपादनाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliticsराजकारण