शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

West Bengal Politics: नाईलाज झाला! पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी रात्री २ वाजता बोलावले विधानसभा अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:50 IST

West Bengal assembly session may Start after Midnight: राज्यपाल धनखड यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र, हे अधिकारी राज्यपालांना भेटण्यासाठी गेले नाहीत. यामुळे राज्यपालांनी अधिवेशन सुरु करण्याची परवानगी देऊन टाकली. 

देशात कधीही घडले नाही अशी घटना पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ यांनी मध्यरात्री २ वाजल्यानंतर विधानसभेचे अधिवेशन बोलविले आहे. यासाठी त्यांचाही नाईलाज झाला आहे. कारणच तसे घडले आहे

पश्चिम बंगालचे ममता सरकार आणि धनखड यांच्यातील कलगीतुरा सर्वांना माहिती आहे. एकदा धनखड यांना भोजनाचे निमंत्रण देऊन ते अचानक रद्द करत विधानसभेचे दरवाजे बंद करण्यात आले होते. बऱ्याचदा धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्याच वाद होत असतात. एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न दोन्ही बाजुंकडून होत असतात. असाच  प्रकार आज घडला आहे. 

पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन घेण्यासाठी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावर चुकून दुपारी दोन ऐवजी रात्री २ असे टाईप झाले. म्हणजेच एम आणि पीएमने घोळ घातला. या प्रस्तावात ७ मार्च (सोमवार) दोन पीएम ऐवजी २ एएम टाईप झाले. या विषयावर राज्यपाल धनखड यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र, हे अधिकारी राज्यपालांना भेटण्यासाठी गेले नाहीत. यामुळे राज्यपालांनी रात्री २ वाजल्यापासूनच अधिवेशन सुरु करण्याची परवानगी देऊन टाकली. 

याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे कळविली आहे. मात्र, रात्री २ वाजता अधिवेशन सुरु करण्याचा प्रस्ताव त्यांनाही रुचलेला नाही, असे म्हटले आहे. या साऱ्या प्रकारानंतर पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली असून पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. विधानसभा अध्यक्ष  बिमान बॅनर्जी यांनी यावर म्हटले की, फक्त टायपिंग मिस्टेक होती. राज्यपाल ती चूक दुरूस्त करू शकले असते. मात्र, त्यांनी मुद्दामहून रात्री २ वाजताची चूक तशीच ठेवल्याने आता रात्रीच अधिवेशन सुरु करावे लागणार आहे. 

राज्यपालांना त्या आधी दोन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यामध्ये दोन पीएम बरोबर गेले होते. तिसऱ्या प्रस्तावात चुकून 2:00 AM गेले, ते हे टाळू शकले असते, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला. जर आता रात्री विधानसभा अधिवेशन सुरु झाले तर तो देशातील पहिलाच असा प्रकार ठरणार आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी