शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Politics: नाईलाज झाला! पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी रात्री २ वाजता बोलावले विधानसभा अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:50 IST

West Bengal assembly session may Start after Midnight: राज्यपाल धनखड यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र, हे अधिकारी राज्यपालांना भेटण्यासाठी गेले नाहीत. यामुळे राज्यपालांनी अधिवेशन सुरु करण्याची परवानगी देऊन टाकली. 

देशात कधीही घडले नाही अशी घटना पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ यांनी मध्यरात्री २ वाजल्यानंतर विधानसभेचे अधिवेशन बोलविले आहे. यासाठी त्यांचाही नाईलाज झाला आहे. कारणच तसे घडले आहे

पश्चिम बंगालचे ममता सरकार आणि धनखड यांच्यातील कलगीतुरा सर्वांना माहिती आहे. एकदा धनखड यांना भोजनाचे निमंत्रण देऊन ते अचानक रद्द करत विधानसभेचे दरवाजे बंद करण्यात आले होते. बऱ्याचदा धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्याच वाद होत असतात. एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न दोन्ही बाजुंकडून होत असतात. असाच  प्रकार आज घडला आहे. 

पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन घेण्यासाठी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावर चुकून दुपारी दोन ऐवजी रात्री २ असे टाईप झाले. म्हणजेच एम आणि पीएमने घोळ घातला. या प्रस्तावात ७ मार्च (सोमवार) दोन पीएम ऐवजी २ एएम टाईप झाले. या विषयावर राज्यपाल धनखड यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र, हे अधिकारी राज्यपालांना भेटण्यासाठी गेले नाहीत. यामुळे राज्यपालांनी रात्री २ वाजल्यापासूनच अधिवेशन सुरु करण्याची परवानगी देऊन टाकली. 

याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे कळविली आहे. मात्र, रात्री २ वाजता अधिवेशन सुरु करण्याचा प्रस्ताव त्यांनाही रुचलेला नाही, असे म्हटले आहे. या साऱ्या प्रकारानंतर पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली असून पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. विधानसभा अध्यक्ष  बिमान बॅनर्जी यांनी यावर म्हटले की, फक्त टायपिंग मिस्टेक होती. राज्यपाल ती चूक दुरूस्त करू शकले असते. मात्र, त्यांनी मुद्दामहून रात्री २ वाजताची चूक तशीच ठेवल्याने आता रात्रीच अधिवेशन सुरु करावे लागणार आहे. 

राज्यपालांना त्या आधी दोन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यामध्ये दोन पीएम बरोबर गेले होते. तिसऱ्या प्रस्तावात चुकून 2:00 AM गेले, ते हे टाळू शकले असते, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला. जर आता रात्री विधानसभा अधिवेशन सुरु झाले तर तो देशातील पहिलाच असा प्रकार ठरणार आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी