शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
3
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
4
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
5
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
6
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
7
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
8
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
9
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
10
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
11
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
12
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
13
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
14
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
15
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
16
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
17
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
18
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
19
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
20
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

ममता सरकारला आणखी एक धक्का; वनमंत्री राजीव बॅनर्जी यांचा राजीनामा

By देवेश फडके | Updated: January 22, 2021 14:32 IST

पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत, तसे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून, आता ममता बॅनर्जी सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालचे वनमंत्री राजीव बॅनर्जी यांचा राजीनामाराजीव बॅनर्जी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चाविधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा सत्र सुरूच

कोलकाता :पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत, तसे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून, आता ममता बॅनर्जी सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीव बॅनर्जी यांनी आपला राजीनामा थेट राज्यपालांकडे पाठवला असून, ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजीव बॅनर्जी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. 

राजीव बॅनर्जी भारतीय जनता पक्षात (भाजप) सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजीव बॅनर्जी नाराज होते. मंत्रिमंडळाच्या तीन बैठकीतही राजीव बॅनर्जी यांनी गैरहजर राहिले होते. यानंतर ते राजीनामा देतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पश्चिम बंगालच्या जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळाले. हा माझा सन्मान आहे. ही संधी मला मिळाली, त्याबाबत मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो, असे राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा देताना म्हटले आहे. 

नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नांना अपयश

राजीव बॅनर्जी बऱ्याच काळापासून पक्षात नाराज होते. राजीव बॅनर्जी यांची नाराजी दूर करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी त्यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या होत्या. मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेरीस राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा दिला, असे सांगितले जात आहे. 

अमित शहांच्या उपस्थित पक्षप्रवेश

पुढील आठवड्यात अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचवेळी राजीव बॅनर्जी हेदेखील भाजप प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच राजीव बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ हावडासह राज्यातील इतर भागात पोस्टरबाजी सुरू झाली आहे.

राजीनामा सत्र सुरूच

गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भट्टाचार्य यांनी सर्वप्रथमच काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणुका जिंकली आणि नंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकBJPभाजपा