शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत निवडणूक?; केरळ, तामिळनाडूत एका टप्प्यातच मतदान शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 06:46 IST

केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुकीसाठी एका टप्प्यातच मतदान शक्य

हरिश गुप्तानवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये तीव्र संघर्ष सुरू असलेल्या पश्चिम बंगालमध्ये  विधानसभेची आगामी निवडणूक  सात टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. तर केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात, आसाममध्ये मात्र दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुका घेतल्या जाण्याची चर्चा आहे.

पश्चिम बंगालसह चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या प्रारंभी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणूक कार्यक्रमावर अखेरचा हात फिरविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक बुधवारी झाली. त्यात केंद्रीय गृहखाते व अन्य खात्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ही चार राज्ये व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच म्हटले होते. या राज्यात निर्भय व निष्पक्ष वातावरणात विधानसभा निवडणुका पार पाडणे; हे आयोगासमोरचे मोठे आव्हान आहे.

६४०० संवेदनशील मतदान केंद्रे 

पश्चिम बंगालमधील कायदा - सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत केंद्रीय निवडणूक आयोग समाधानी नाही. २०११ आणि २०१६ साली या राज्यात विधानसभा निवडणुका सहा टप्प्यांत पार पडल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ६,४००वर पोहोचली आहे. तर एकूण मतदान केंद्रांची संख्या ३० हजारांपेक्षा अधिक आहे.

बिहारची पद्धत वापरणार प. बंगालसाठी

विविध शैक्षणिक बोर्डांच्या परीक्षाही नेमक्या याच काळात होणार आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जरा लवकर घेण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो. ममता बॅनर्जी यांच्या सरकारची मुदत ३० मे रोजी संपत आहे. बिहारमध्ये टप्प्याटप्प्याने विधानसभा निवडणुका घेण्यात येतात. तीच पद्धत निवडणूक आयोग पश्चिम बंगालसाठी वापरणार आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जी