शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

'म्हणतात ठोक दो, ठोक दो..., जर आम्ही एक झालो तर...'; ईदीच्या शुभेच्छा देत ममतांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 15:10 IST

जर आपण लोकशाहीचे रक्षण करण्यात अयशस्वी झालो, तर सर्व नष्ट होईल. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे.

आम्हाला दंगली संघर्ष नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे. आम्हाला देशाचे विभाजन करायचे नाही. मी मरेन, पण देशाचे विभाजन होऊ देणार नाही. मात्र काही लोक भाजपकडून पैसे घेतात आणि आम्ही मुस्लीम मते फोडू, असे म्हणतात, पण असे होऊ शकत नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या ईद निमित्त आयोजित एका कार्यक्रमात शुभेच्छा देताना बोलत होत्या.

कार्यक्रमाला संबोधित करताना ममता म्हणाल्या, मी अर्थिक शक्ती आणि केंद्रीय एजन्सींसोबत लढायला तयार आहे. पण मी वाकणार नाही. आपल्या देशात कुणाची सत्ता येणार हे ठरवण्यासाठी वर्षभरात निवडणुका होणार आहेत. आपण संघटित होऊन फूटीर शक्तींचा सामना करण्यासाठी वचनबद्ध होऊयात. जर आपण लोकशाहीचे रक्षण करण्यात अयशस्वी झालो, तर सर्व नष्ट होईल. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे.

यावेळी ममता यांनी एनआरसीच्या मुद्द्यालाही हात घातला. त्या म्हणाल्या, NRC लागू करण्याची त्यांची इच्छा आहे. पण मी असे होऊ देणार नाही. कुणाचाही उल्लेख न करता ममता म्हणाल्या, एक नेता तो असतो, जो फुटीरतावाद्यांच्या विरोधात जाऊन सर्वांची काळजी घेतो. पण ते आम्हाला प्रचंड त्रास देतात. त्याची दादागिरी आणि फक्त बोलणे थांबावे, अशी मी अल्लाहला प्रार्थना करतो.

एवढेच नाही, तर "ते म्हणतात ठोक दो, ठोक दो..., अरे ठोक दो काय? जर आम्ही एकत्र आलो, तर तुमची खुर्ची कोसळेल," असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. यावेळी बिल्किस बानो प्रकरणाबाबत ममता म्हणाल्या, या प्रकरणात सर्वांची सुटका झाली आहे, पण आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार. नेत्यांनी नेहमीच एकी कायम ठेवायला हवी. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आम्हाला शक्ती दे. आपण संघटित राहिलो, तर मला खात्री आहे की, ते सत्तेतून बाहेर फेकले जातील, असेही ममता यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल