शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'म्हणतात ठोक दो, ठोक दो..., जर आम्ही एक झालो तर...'; ईदीच्या शुभेच्छा देत ममतांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 15:10 IST

जर आपण लोकशाहीचे रक्षण करण्यात अयशस्वी झालो, तर सर्व नष्ट होईल. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे.

आम्हाला दंगली संघर्ष नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे. आम्हाला देशाचे विभाजन करायचे नाही. मी मरेन, पण देशाचे विभाजन होऊ देणार नाही. मात्र काही लोक भाजपकडून पैसे घेतात आणि आम्ही मुस्लीम मते फोडू, असे म्हणतात, पण असे होऊ शकत नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या ईद निमित्त आयोजित एका कार्यक्रमात शुभेच्छा देताना बोलत होत्या.

कार्यक्रमाला संबोधित करताना ममता म्हणाल्या, मी अर्थिक शक्ती आणि केंद्रीय एजन्सींसोबत लढायला तयार आहे. पण मी वाकणार नाही. आपल्या देशात कुणाची सत्ता येणार हे ठरवण्यासाठी वर्षभरात निवडणुका होणार आहेत. आपण संघटित होऊन फूटीर शक्तींचा सामना करण्यासाठी वचनबद्ध होऊयात. जर आपण लोकशाहीचे रक्षण करण्यात अयशस्वी झालो, तर सर्व नष्ट होईल. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे.

यावेळी ममता यांनी एनआरसीच्या मुद्द्यालाही हात घातला. त्या म्हणाल्या, NRC लागू करण्याची त्यांची इच्छा आहे. पण मी असे होऊ देणार नाही. कुणाचाही उल्लेख न करता ममता म्हणाल्या, एक नेता तो असतो, जो फुटीरतावाद्यांच्या विरोधात जाऊन सर्वांची काळजी घेतो. पण ते आम्हाला प्रचंड त्रास देतात. त्याची दादागिरी आणि फक्त बोलणे थांबावे, अशी मी अल्लाहला प्रार्थना करतो.

एवढेच नाही, तर "ते म्हणतात ठोक दो, ठोक दो..., अरे ठोक दो काय? जर आम्ही एकत्र आलो, तर तुमची खुर्ची कोसळेल," असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. यावेळी बिल्किस बानो प्रकरणाबाबत ममता म्हणाल्या, या प्रकरणात सर्वांची सुटका झाली आहे, पण आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार. नेत्यांनी नेहमीच एकी कायम ठेवायला हवी. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आम्हाला शक्ती दे. आपण संघटित राहिलो, तर मला खात्री आहे की, ते सत्तेतून बाहेर फेकले जातील, असेही ममता यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल