शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:43 IST

Mamata Banerjee on Bangladesh Violence: बांगलादेशात छळ होत असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करण्याचीही मागणी

Mamata Banerjee on Bangladesh Violence: भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशची परिस्थिती अजूनही बिकट आहे. तेथे अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर हल्ले सुरूच आहेत आणि त्यांना अमानुष वागणूक दिली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) बांगलादेशमध्ये शांतता मोहीम राबवण्याचे प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारला केली. तसेच, बांगलादेशात छळ होत असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाची मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील सद्यस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका संसदेला कळवावी, अशी मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या की, जर हे काम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपलब्ध नसतील, तर परराष्ट्रमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी निवेदन करावे.

MEA ने हस्तक्षेपाबाबत UN शी बोलावे: मुख्यमंत्री ममता

दिवसाच्या पहिल्या सत्रादरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाले की, दोन देशांमधील द्विपक्षीय मुद्द्यांवर भाष्य करणे आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर आहे, कारण बंगाल हे देशाच्या संघराज्य व्यवस्थेतील एक राज्य आहे. पण असे असले तरीही अलीकडील घडामोडी आणि शेजारच्या देशातील नागरिकांवर होणारे अत्याचार पाहता शांत बसून चालणार नाही. अनेकांचे नातेवाईक तेथे आहेत. त्या नातेवाईकांनी त्यांचे वाईट अनुभव कथन केलेले आहेत. बंगालमधील अनेक लोक कामानिमित्त या देशात आहेत. अशा लोकांना करण्यात आलेली अटक आणि इस्कॉनशी असलेले संबंध पाहता, मला या सभागृहात हे सांगणे भाग पडले आहे की आता परराष्ट्र मंत्रालयाने यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. परराष्ट्र मंत्रालयाला बांगलादेशी अधिकाऱ्यांसह आणि आवश्यक असल्यास संयुक्त राष्ट्रांकडे हा मुद्दा उचलण्याची विनंती मी केली आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :BangladeshबांगलादेशMamata Banerjeeममता बॅनर्जी