शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:43 IST

Mamata Banerjee on Bangladesh Violence: बांगलादेशात छळ होत असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करण्याचीही मागणी

Mamata Banerjee on Bangladesh Violence: भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशची परिस्थिती अजूनही बिकट आहे. तेथे अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर हल्ले सुरूच आहेत आणि त्यांना अमानुष वागणूक दिली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) बांगलादेशमध्ये शांतता मोहीम राबवण्याचे प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारला केली. तसेच, बांगलादेशात छळ होत असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाची मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील सद्यस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका संसदेला कळवावी, अशी मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या की, जर हे काम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपलब्ध नसतील, तर परराष्ट्रमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी निवेदन करावे.

MEA ने हस्तक्षेपाबाबत UN शी बोलावे: मुख्यमंत्री ममता

दिवसाच्या पहिल्या सत्रादरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाले की, दोन देशांमधील द्विपक्षीय मुद्द्यांवर भाष्य करणे आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर आहे, कारण बंगाल हे देशाच्या संघराज्य व्यवस्थेतील एक राज्य आहे. पण असे असले तरीही अलीकडील घडामोडी आणि शेजारच्या देशातील नागरिकांवर होणारे अत्याचार पाहता शांत बसून चालणार नाही. अनेकांचे नातेवाईक तेथे आहेत. त्या नातेवाईकांनी त्यांचे वाईट अनुभव कथन केलेले आहेत. बंगालमधील अनेक लोक कामानिमित्त या देशात आहेत. अशा लोकांना करण्यात आलेली अटक आणि इस्कॉनशी असलेले संबंध पाहता, मला या सभागृहात हे सांगणे भाग पडले आहे की आता परराष्ट्र मंत्रालयाने यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. परराष्ट्र मंत्रालयाला बांगलादेशी अधिकाऱ्यांसह आणि आवश्यक असल्यास संयुक्त राष्ट्रांकडे हा मुद्दा उचलण्याची विनंती मी केली आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :BangladeshबांगलादेशMamata Banerjeeममता बॅनर्जी