शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

अनुच्छेद 370 हटवल्यावरून मुख्यमंत्री ममतांचा भाजपवर निशाणा, केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 20:37 IST

“आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालचे नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल."

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनुच्छेद 370 हटविल्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. अनुच्छेद 370 हटविल्याने काश्मिरी नागरिकांचे स्वातंत्र्य, त्यांच्या मागण्या आणि त्यांचे हित कमकुवत झाले आहे, असे ममतांनी म्हटले आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. 

बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालच्या नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल." एवढ्यावरच ममता थांबल्या नाही, तर एवढ्या मोठ्या निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना कसल्याही प्रकारची शरम नाही, असेही ममता म्हणाल्या. 

बंगाल भाजपत मोठी फूट? 74 पैकी फक्त 51 आमदारांनाच राजभवनात नेऊ शकले सुवेंदू

एक देश-एक रेशन कार्ड प्रणालीला विरोध नाही -सर्वोच्च न्यायालयाच्या एक देश एक रेशन कार्ड धोरणाचा स्वीकार करण्यासंदर्भात बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, "आम्हाला एक जेश-एक रेशन कार्ड प्रणालीसंदर्भात कसल्याही प्रकारची समस्या नाही. आम्ही तीन महिन्यांतच लागू करू. काही लोकांकडे आधारकार्ड नाही, आम्ही तयार करत आहोत," असेही ममता म्हणाल्या.

भाजप नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या -टीएमसी सोडून भाजपत गेलेले मुकूल रॉय नुकतेच पुन्हा ममता बॅनर्जींसोबत गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणखी काही नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूण परिस्थिती पाहता, भाजपचे अनेक आमदार पुन्हा टीएमसीत जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालArticle 370कलम 370