शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अनुच्छेद 370 हटवल्यावरून मुख्यमंत्री ममतांचा भाजपवर निशाणा, केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 20:37 IST

“आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालचे नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल."

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनुच्छेद 370 हटविल्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. अनुच्छेद 370 हटविल्याने काश्मिरी नागरिकांचे स्वातंत्र्य, त्यांच्या मागण्या आणि त्यांचे हित कमकुवत झाले आहे, असे ममतांनी म्हटले आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. 

बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालच्या नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल." एवढ्यावरच ममता थांबल्या नाही, तर एवढ्या मोठ्या निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना कसल्याही प्रकारची शरम नाही, असेही ममता म्हणाल्या. 

बंगाल भाजपत मोठी फूट? 74 पैकी फक्त 51 आमदारांनाच राजभवनात नेऊ शकले सुवेंदू

एक देश-एक रेशन कार्ड प्रणालीला विरोध नाही -सर्वोच्च न्यायालयाच्या एक देश एक रेशन कार्ड धोरणाचा स्वीकार करण्यासंदर्भात बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, "आम्हाला एक जेश-एक रेशन कार्ड प्रणालीसंदर्भात कसल्याही प्रकारची समस्या नाही. आम्ही तीन महिन्यांतच लागू करू. काही लोकांकडे आधारकार्ड नाही, आम्ही तयार करत आहोत," असेही ममता म्हणाल्या.

भाजप नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या -टीएमसी सोडून भाजपत गेलेले मुकूल रॉय नुकतेच पुन्हा ममता बॅनर्जींसोबत गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणखी काही नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूण परिस्थिती पाहता, भाजपचे अनेक आमदार पुन्हा टीएमसीत जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालArticle 370कलम 370