शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

"जेवणासाठी पैसे हवे असतील तर मी देईन…", ममता बॅनर्जी राज्यपालांना असं का म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 15:02 IST

Mamata Banerjee : आमदारांना दंड ठोठावल्याने ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांच्यात विविध कारणांवरून वाद सुरू आहे. अशात आता चार नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी प्रक्रियेबाबत दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे दिसून येते. राज्यपालांनी चार नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी प्रक्रियेत विनाकारण अडथळे निर्माण केल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निडवणुकीबरोबरच विधानसभेची पोटनिवडणूकही पार पडली होती. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या चार उमेदवारांचा विजय झाला होता. त्यानंतर ५ जुलै रोजी विधानसभेत त्यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. मात्र, काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना राज्यपालांनी पत्र लिहत त्यांची शपथ घटनात्मदृष्ट्या योग्य नसल्याचं सांगितलं. तसंच त्यांना सभागृहाच्य कामकाजात सहभागी होण्यास मनाई केली. मात्र, तरीही दोन्ही आमदारांनी सभागृहाच्या कामकाजत भाग घेतला. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना प्रतिदिन ५०० रुपयांचा दंड ठोठावला.

आमदारांना दंड ठोठावल्याने ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. आमदारांना दंड ठोठवायला राज्यपालांकडे पेसै नाहीत का? त्यांना जेवण्याच्या डब्यासाठी पैसे हवे असतील तर त्यांनी माझ्याकडे मागावे, मी त्यांना पैसे देईन, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना लगावला. तसंच, राज्यपाल सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. 

जनादेशाच्या जोरावर निवडून आलेल्या आमदारांचं कौतुक करण्याऐवजी दंड ठोठावत आहात. ही क्रूरता आहे, दोन नवनिर्वाचित आमदारांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा प्रयत्न आहे. राज्यपालांनी हे लक्षात ठेवावं की त्यांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे केली जाते. तुम्ही संविधानाचे पालन केले पाहिजे आणि कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाप्रती पक्षपाती होऊ नका. राज्यपालांना नीट परीक्षेतील घोटाळेबाजांना दंड ठोठावता येत नाही. ते घोटाळेबाज त्यांना दिसत नाही. त्यांना दंड ठोठावण्यासाठी फक्त आमदार दिसतात, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल