शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

ममतांच्या आशेवर पाणी, नंदीग्राममध्ये शुभेंदूच राहणार विजयाचे 'अधिकारी'; आरओंची सुरक्षा वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:56 IST

ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. मात्र तो निवडणूक आयोगाने फेटाळला. आयोगाने म्हटले आहे...

नंदीग्राम - पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आपले पूर्वीचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीतील पराभवानंतर, पुन्हा मतमोजणी करण्याची त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की रिटर्निंग ऑफिसरचा निर्णय अंतिम आहे आणि या निर्णयाला केवळ उच्च न्यायालयातच आव्हान दिले जाऊ शकते. यानंतर आता नंदीग्राममध्ये आरओ राहिलेल्या अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (West Bengal Assembly Elections 2021 big blow for mamata banerjee eci says no recounting in nandigram)

नंदीग्राममध्ये दुसऱ्यांदा मतमोजणी होणार, यासंदर्भात माध्यमांत आलेले वृत्त निवडणूक आयोगाने फेटाळले आहे. आयोगाने म्हटले आहे, की एखाद्या विधानसभा मतदारसंघात रिटर्निंग अधिकारी (आरओ) आरपी अॅक्ट, 1951 अंतर्गत अर्ध-न्यायिक क्षमतेने स्वतंत्रपणे आणि निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणेच आपले काम करत असतात.

खुद्द 'ट्विटर'नंच सांगितलं; ...म्हणून सस्पेंड करण्यात आलं कंगना रणैतचं अकाउंट!

निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की नियमाप्रमाणे, जर दुसऱ्यांदा मतमोजणीची मागणी करण्यात आली, तर रिटर्निंग अधिकाऱ्याला ती स्वीकारण्याचा अथवा असंगत वाटल्यास नाकारण्याचाही अधिकार आहे. आरओंच्या निर्णयाला आरपी अॅक्ट 1951 च्या कलम 80 अंतर्गत निवडणूक याचिकेच्या सहाय्यानेच आव्हान दिले जाऊ शकते.

निवडणूक आयोगाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ''नंदीग्राममध्ये मोजणी संपल्यानंतर एका उमेदवाराच्या इलेक्शन एजन्टने दुसऱ्यांदा मतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, आरओंनी आपल्या समोरील तथ्यांच्या आधारी ती तोंडी आदेशाने फेटाळली. यानंतर निकालाची घोषणा करण्यात आली. यानंतर केवळ उच्च न्यायालयात जाण्याचाच मार्ग शिल्लक राहतो. 

'मतमोजणी प्रक्रियेत गडबड नाही' -यासंदर्भात, ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. मात्र तो निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. आयोगाने म्हटले आहे, की सर्वच काउंटींग टेबलवर एक मायक्रो ऑब्झर्वर होते आणि त्यांनी आपल्यारिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारची गडबड झाल्याचा संकेत दिला नाही. सर्व राउंड्सनंतर आरओंनी सर्व उमेदवारांनी मिळालेल्या मतांची एंट्री केली होती. तसेच ती डिस्प्ले बोर्डावरही दर्शविली होती. हे काउंटिंग एजन्ट्स सहजपणे बघू शकत होते. संपूर्ण मोजमी प्रक्रियेदरम्यान कुणीही यावर शंका व्यक्त केली नाही. तसेच प्रत्येक राउंडनंतर सर्व एजन्ट्सना रिझल्टची कॉपी देण्यात येत होती.

West Bengal Election 2021: “असा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होते”; जेपी नड्डा कडाडले

आरओंना देण्यात आली सुरक्षा - निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की नंदीग्रामच्या आरओंवरील दबावासंदर्भात माध्यामंत आलेल्या वृत्तानंतर पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना 3 मेरोजी आदेश देण्यात आला आहे, की आरओंना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी. राज्य सरकारने त्यांना सुरक्षा दिली आहे. तसेच आयोगाने पश्चिम बंगालच्या सीईओंना सर्व निवडणूक रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यात यावे, असेही सांगितले आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMamata Banerjeeममता बॅनर्जी