शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे केंद्राकडून स्वागत-जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 04:10 IST

सीबीआयच्या संचालकांची केंद्रीय दक्षता आयोगाने दोन आठवड्यांत चौकशी करावी, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश अतिशय सकारात्मक आहे.

नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालकांची केंद्रीय दक्षता आयोगाने दोन आठवड्यांत चौकशी करावी, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश अतिशय सकारात्मक आहे. ज्या संस्थेच्या प्रमुखांवरच आरोप झाले, अशा सीबीआयची प्रतिष्ठा अबाधित राखणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने योग्य तीच भूमिका घेतली होती. केंद्र सरकार कोणत्याही व्यक्तीच्या बाजूचे किंवा विरोधात नाही, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी सांगितले.जेटली म्हणाले की, अलीकडच्या काही घटनांमुळे सीबीआयची विश्वासार्हता धोक्यात आली होती. तिला धक्का लागू नये म्हणून सीबीआयचे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. ज्यांच्यावर आरोप झाले आहेत आणि ज्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, अशाप्रकरणी त्यांच्याच हाती सीबीआयची सूत्रे असणे सरकारला योग्य वाटले नाही. केंद्रीय दक्षता आयोगाने केलेल्या शिफारसीनुसारच केंद्राने दोन्ही अधिकाºयांविरोधात कारवाई केली आहे. निष्पक्षपाती चौकशी होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हे सकारात्मक पाऊल आहे.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली