शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

चीनएवढेच आम्हीही तुल्यबळ, घुसखोरी अजिबात खपवून घेणार नाही - लष्करप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 05:50 IST

भारत आपल्या भूमिवर कोणाचेही आक्रमण खपवून घेणार नाही, असे ठाम मत मांडतानाच लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पुढे सांगितले की, चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी नाही. तोही बलवान आहे.

नवी दिल्ली : भारत आपल्या भूमिवर कोणाचेही आक्रमण खपवून घेणार नाही, असे ठाम मत मांडतानाच लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पुढे सांगितले की, चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी नाही. तोही बलवान आहे.बिपिन रावत यांनी आज पत्रकारांना सांगितले की, उत्तर सीमेवर भारताने आता अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. चीनच्या आक्रमक धोरणाला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतात आहे. भारताच्या उत्तर सीमाभागात चीनी लष्कराने घुसखोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याबाबत ते म्हणाले की, आमच्या सीमा भागात कोणी घुसखोरी करत असेल, तर ते भारत अजिबात खपवून घेणार नाही. चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी बलवान नाही. चीनकडून सीमेवर सातत्याने कारवाया सुरू असून, भारताने कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची तयारी ठेवली आहे.शस्त्रसामुग्रीची ने-आण एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जलद गतीने करता यावी, तसेच उत्तर सीमेवरून पश्चिम सीमेवर लष्कर वेगाने हलविता यावे, यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करण्यावर भारताला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.रासायनिक, जैविक शस्त्रे आणि अण्वस्त्रांच्या वापराचा वाढता धोकारासायनिक, जैविक, रेडिआॅलॉजिकल अस्त्रे व अण्वस्त्रांच्या वापराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे, असे सांगून बिपिन रावत पुढे म्हणाले की, अशा शस्त्रे चुकीच्या माणसांच्या हातात पडणे व त्यांनी त्यांचा वापर करण्याचा धोका निर्माण होणे ही सर्वात गंभीर गोष्ट आहे. या शस्त्रांमुळे मोठी जीवितहानी व वित्तहानी होण्याचा धोका असून, त्याचे दूरगामी परिणामही भोगावे लागतील.काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बीमोड करूगेल्या वर्षी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बीमोड करण्यावर लष्कराने लक्ष केंद्रित केले होते. यंदाच्या वर्षी उत्तर काश्मीरमध्ये आम्ही दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी अधिक सक्रिय राहू, असे लष्करप्रमुख बिपिन रावत पुढे म्हणाले.आपल्याही जवानांना चांगल्या सुविधा हव्यातचीनच्या लष्कराचे उत्तर सीमेवर घुसखोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच सिक्कीम, तसेच ईशान्य सीमेवर तैनात भारतीय जवानांना बुलेट प्रूफ हेल्मेट देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा लागला, अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बिपिन रावत म्हणाले की, चीनचे सैन्य आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. त्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या आपल्याही जवानांना उत्तम दर्जाची जॅकेट्स व हेल्मेट मिळायला हवीत, असा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत