शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

"मालदीव असं काही करणार नाही ज्यामुळे भारताला..."; मोहम्मद मुइज्जूंचे चीनबाबत मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 10:41 IST

Mohamed Muizzu : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताच्या सुरक्षेला कधीही धक्का पोहोचू देणार नाही, असे म्हटले आहे

Maladiv Mohamed Muizzu In India : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष  मोहम्मद मुइज्जू आणि मालदीवच्या फर्स्ट लेडी साजिदा मोहम्मद या भारत दौऱ्यावर आहेत. भारताच्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी रविवारी दोघेही नवी दिल्लीत आले. यादरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुइज्जू यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या मालदीवच्या अध्यक्षांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. यावेळी मोहम्मद मुइज्जू यांनी भारताच्या सुरक्षेला कधीही धक्का पोहोचू देणार नाही, असे म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी चीनचा देखील उल्लेख केला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. मुइज्जू रविवारी त्यांच्या पत्नीसह नवी दिल्लीत पोहोचले. मुइज्जू यांचे सरकार मालदीवमध्ये आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशाचे भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यासाठी मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला भेट दिली आहे. चीनच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे मुइज्जू हे सत्तेत बसल्यापासून हाती घेतल्यापासून भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले गेले होते. पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत त्यांच्या मंत्र्‍यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती.

त्यानंतर आता भारत दौऱ्यादरम्यान मोइज्जू यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. एका मुलाखतीमध्ये तुम्ही चीनसोबत काम करत आहात, त्यामुळे भारताला खात्री आहे का की मालदीव भारताच्या संरक्षण हितांवर परिणाम होईल असे काहीही करणार नाही, असा प्रश्न मुइज्जू यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना चीनसोबतच्या संबंधांमुळे भारताच्या सुरक्षेला कधीही धोका निर्माण होणार नाही, असं विधान मोहम्मद मुइज्जू यांनी केलं आहे. "मालदीव भारताची सुरक्षा कमकुवत होईल असे काहीही करणार नाही. भारत हा मालदीवचा महत्त्वाचा भागीदार आणि मित्र आहे आणि आमचे संबंध परस्पर आदर आणि समान हितांवर आधारित आहेत," असं मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं.

यावेळी मुइज्जू यांना मालदीवमधून भारतीय सैन्याच्या माघारीच्या निर्णयाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. "मालदीव आणि भारत यांना आता एकमेकांचे प्राधान्यक्रम आणि चिंता या गोष्टी चांगल्या प्रकारे समजल्या आहेत. मालदीवच्या लोकांनी मला जे सांगितले ते मी केले. सैन्य मागे घेण्याचा निर्णय हा आमचा देशातील लोकांसाठी असलेला प्राधान्यक्रम दाखवत होता. आमच्या भूतकाळातील करारांवर निर्णय घेण्याचे उद्दिष्ट आमच्या राष्ट्रीय हितांशी सुसंगत आणि स्थिरतेसाठी सकारात्मक योगदान देण्याचे होते, असेही मोहम्मद मुइज्जू म्हणाले.

दरम्यान, मुइज्जू यांच्या भेटीदरम्यान परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारत आणि मालदीवमधील संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :delhiदिल्लीIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी