शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरची शांतता व विकासाच्या आड येणाऱ्या सर्वांना तुरुंगात टाकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:04 IST

राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरपुढे शांतता व विकास असे दोनच मार्ग आहेत.

श्रीनगर : राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरपुढे शांतता व विकास असे दोनच मार्ग आहेत. जो कोणी यात खोटा घालण्याचा प्रयत्न करील त्याला तुरुंगात डांबले जाईल, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पार्टीचे काश्मीरविषयीचे प्रभारी सरचिटणीस राम माधव यांनी रविवारी येथे दिला.

काश्मीरमध्ये भाजपतर्फे येथील चागोर हॉलमध्ये युवा मोर्चाच्या सम्मेलनाच्या रूपाने पहिलाच राजकीय कार्यक्रम झाला. त्यात बोलताना राम माधव म्हणाले की, आत्तापर्यंत काश्मीरमध्ये जे काही केले जात होते ते फक्त काही निवडक नेते किंवा निवडक कुटुंबांसाठी केले जात होते. पण आता काश्मीर सामान्य काश्मिरी नागरिकांच्या भल्यासाठी कामाला लागले आहे. लोक हाती शस्त्रे घेतील व प्राण द्यायलाही तयार होतील, असे संदेश काही नेते तुरुंगातून समाजमाध्यमांत टाकत आहेत. मी त्या नेत्यांना सागेन की, इतरांना चिथावण्यापेक्षा स्वत: पुढे या व काय त्याग करायचा तो करा.

भारतात खूप तुरुंग आहेत...

राम माधव पुढे म्हणाले की, यापुढे काश्मीरपुढे शांतता व विकास हे दोनच मार्ग असतील. जे कोणी याच्या आड येतील त्यांची जराही गय केली जाणार नाही. अशा लोकांना ठेवण्यासाठी भारतात खूप तुरुंग आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर