शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बंगालमध्ये टीएमसी करु शकते नरसंहार; मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 15:42 IST

पराभव समोर दिसत असल्याने टीएमसी कार्यकर्ते घाबरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंसेचा वापर केला जात आहे. तसेच टीएमसीच्या हिंसाचाराविरोधात भाजपा पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपून मतदानाच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र देशभरात निवडणुकीत गाजलेल्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीचं राजकारण आणखी तापू शकतं. कारण मतदानाच्या दिवशीही भाजपा आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद घडल्याचे प्रकार घडले आहेत. डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार निलंजन रॉय यांच्या गाडीवर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच मतदारांनाही मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप भाजपाने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये आज 9 जागांसाठी मतदान होत आहे. मात्र 6 लोकसभा जागांवर हिंसक घटना घडल्याने निवडणुकीचं वातावरण चिंतेत टाकणारे आहे. 

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालमधील मतदानावर भाष्य करताना तेथे घडत असलेल्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भाजपा उमेदवारांवर तसेच कार्यकर्त्यांवर राजरोसपणे टीएमसी कार्यकर्त्यांकडून हल्ले केले जात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री इंच-इंच बदला घेण्याची भाषा करतात, त्यामुळे बंगालमधील मतदान संपल्यानंतर टीएमसीद्वारे नरसंहार होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत केंद्रीय सुरक्षा दल पश्चिम बंगालमध्ये तैनात ठेवावे अशी मागणीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.   

पराभव समोर दिसत असल्याने टीएमसी कार्यकर्ते घाबरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंसेचा वापर केला जात आहे. तसेच टीएमसीच्या हिंसाचाराविरोधात भाजपा पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यातील टोकाच्या दुश्मनीमुळे झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने वातावरण आणखी चिघळू नये यासाठी तेथील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार ठरल्या वेळेच्या एक दिवस आधीच बंद करण्याचा आदेश बुधवारी दिला होता. आजवरच्या कोणत्याही निवडणुकीत आयोगाला असे टोकाचे पाऊल उचलावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला होता. यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. अमित शहांचा ट्रक जात असताना त्यावर काठ्या भिरकावल्याने तणाव निर्माण झाला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनtmcठाणे महापालिकाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019