शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 06:37 IST

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात

थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर येथून सुरुवात केली. वांशिक हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याचे वचन त्यांनी या वेळी दिले. ‘आम्हाला तुमची वेदना समजते; सौहार्द, शांतता परत आणू,’ अशी फुंकर राहुल गांधी यांनी घातली. मणिपूरची राजधानी इंफाळच्या दक्षिणेला असलेल्या थौबलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना गांधींनी, ‘कदाचित भाजप आणि आरएसएससाठी मणिपूर हा भारताचा भाग नव्हता,’ अशी टीका केली. ही यात्रा ६,७१३ किमी अंतर कापून १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा क्षेत्र आणि ११० जिल्ह्यांतून जाईल. यात्रेचा ६७ दिवसांनी २० मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे.

कट्टरतावादी शक्तींशी आमचा लढा : खरगेमल्लिकार्जुन खरगे यांनी यात्रेच्या बसचे अनावरण केले. ते म्हणाले, ‘काँग्रेस सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समानतेच्या बाजूने आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आणि कट्टरतावादी शक्तींशी लढा देण्यासाठी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढण्यात येत आहे. आमचे नेते शांततेच्या संदेशासाठी घरोघरी फिरत आहे, याचा मला अभिमान आहे.’ 

काँग्रेसने आपल्या नेत्यांना न्याय द्यावा : भाजपमुंबई दक्षिणचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी पहाटे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला फटकारताना काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जयवीर शेरगील म्हणाले की, ‘काँग्रेसची ‘तोडो यात्रा’ सुरू झाली आहे.’ भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, ‘काँग्रेसने न्याय यात्रा काढण्यापेक्षा आधी आपल्या नेत्यांना न्याय द्यावा.’

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा