शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 06:37 IST

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात

थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर येथून सुरुवात केली. वांशिक हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याचे वचन त्यांनी या वेळी दिले. ‘आम्हाला तुमची वेदना समजते; सौहार्द, शांतता परत आणू,’ अशी फुंकर राहुल गांधी यांनी घातली. मणिपूरची राजधानी इंफाळच्या दक्षिणेला असलेल्या थौबलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना गांधींनी, ‘कदाचित भाजप आणि आरएसएससाठी मणिपूर हा भारताचा भाग नव्हता,’ अशी टीका केली. ही यात्रा ६,७१३ किमी अंतर कापून १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा क्षेत्र आणि ११० जिल्ह्यांतून जाईल. यात्रेचा ६७ दिवसांनी २० मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे.

कट्टरतावादी शक्तींशी आमचा लढा : खरगेमल्लिकार्जुन खरगे यांनी यात्रेच्या बसचे अनावरण केले. ते म्हणाले, ‘काँग्रेस सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समानतेच्या बाजूने आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आणि कट्टरतावादी शक्तींशी लढा देण्यासाठी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढण्यात येत आहे. आमचे नेते शांततेच्या संदेशासाठी घरोघरी फिरत आहे, याचा मला अभिमान आहे.’ 

काँग्रेसने आपल्या नेत्यांना न्याय द्यावा : भाजपमुंबई दक्षिणचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी पहाटे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला फटकारताना काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जयवीर शेरगील म्हणाले की, ‘काँग्रेसची ‘तोडो यात्रा’ सुरू झाली आहे.’ भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, ‘काँग्रेसने न्याय यात्रा काढण्यापेक्षा आधी आपल्या नेत्यांना न्याय द्यावा.’

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा