शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 06:37 IST

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात

थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर येथून सुरुवात केली. वांशिक हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याचे वचन त्यांनी या वेळी दिले. ‘आम्हाला तुमची वेदना समजते; सौहार्द, शांतता परत आणू,’ अशी फुंकर राहुल गांधी यांनी घातली. मणिपूरची राजधानी इंफाळच्या दक्षिणेला असलेल्या थौबलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना गांधींनी, ‘कदाचित भाजप आणि आरएसएससाठी मणिपूर हा भारताचा भाग नव्हता,’ अशी टीका केली. ही यात्रा ६,७१३ किमी अंतर कापून १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा क्षेत्र आणि ११० जिल्ह्यांतून जाईल. यात्रेचा ६७ दिवसांनी २० मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे.

कट्टरतावादी शक्तींशी आमचा लढा : खरगेमल्लिकार्जुन खरगे यांनी यात्रेच्या बसचे अनावरण केले. ते म्हणाले, ‘काँग्रेस सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समानतेच्या बाजूने आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आणि कट्टरतावादी शक्तींशी लढा देण्यासाठी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढण्यात येत आहे. आमचे नेते शांततेच्या संदेशासाठी घरोघरी फिरत आहे, याचा मला अभिमान आहे.’ 

काँग्रेसने आपल्या नेत्यांना न्याय द्यावा : भाजपमुंबई दक्षिणचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी पहाटे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला फटकारताना काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जयवीर शेरगील म्हणाले की, ‘काँग्रेसची ‘तोडो यात्रा’ सुरू झाली आहे.’ भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, ‘काँग्रेसने न्याय यात्रा काढण्यापेक्षा आधी आपल्या नेत्यांना न्याय द्यावा.’

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा