शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

संपुआच्या काळात तोट्यात गेलेल्या सरकारी बँका आम्ही केल्या मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 06:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी : ७० हजार जणांना दिली नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) सरकारने घोटाळे करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बरबाद केले होते. आपल्या सरकारने या बँकांना मजबूत केल्यामुळे आता भारत आतामजबूत बँकिंग क्षेत्रासाठी ओळखला जातो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी ७० हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना डिजिटल माध्यमाद्वारे नियुक्तिपत्रे जारी केली. रोजगार मेळाव्यास संबोधित करताना मोदी यांनी सांगितले की, आज नियुक्त्या मिळालेल्या कर्मचाऱ्यांत बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. संपुआ सरकारच्या काळातील अनेक घोटाळ्यांमुळे बँकिंग क्षेत्र बरबाद झाले होते. फोन बँकिंग घोटाळा हा त्यातलाच एक. त्यामुळे बॅंकांची कंबर माेडली हाेती. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे, असे पंतप्रधान माेदी म्हणाले. 

बॅंका आता विक्रमी नफ्यासाठी ओळखल्या जातात

पूर्वीच्या सरकारच्या काळात नेते आणि त्यांच्या परिवाराच्या मर्जीतील लोकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली जात होती. या कर्जांची परतफेड केली जात नव्हती. बँका हजारो कोटी रुपयांचे घोटाळे आणि एनपीए यासाठी ओळखल्या जात होत्या.  आपल्या सरकारने हे सर्व प्रकार रोखले. बँक व्यवस्थापन मजबूत केले. आता बॅंका विक्रमी नफ्यासाठी ओळखल्या जातात.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

८ महिन्यांत ४.३३ लाख लोकांना मिळाल्या नाेकऱ्या

 पंतप्रधानांनी २२ ऑक्टाेबर २०२२ रोजी राेजगार मेळाव्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात केली हाेती. 

 २०२३ च्या अखेरपर्यंत १० लाख सरकारी नाेकऱ्या देण्याचे लक्ष्य असल्याचे माेदी यांनी सांगितले हाेते. 

तेव्हापासून ४.३३ लाख जणांना नियुक्तिपत्रे दिली आहेत.

या विभागांमध्ये नियुक्त्या

महसूल, वित्तीय सेवा, टपाल, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, संरक्षण, आराेग्य व कुटुंब कल्याण, गृह मंत्रालय, जलसंधारण, इत्यादी विभागांमध्ये नियुक्त्या हाेणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbankबँक