शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा करू

By admin | Updated: May 29, 2016 03:37 IST

भाजपा सरकारच्या सत्तेतील दोन वर्षांच्या काळात मोठे बदल झाले आहेत. सुशासनाची अंमलबजावणी करताना भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्याची आम्ही शपथ घेतली आहे. ज्या सर्वसामान्य

नवी दिल्ली : भाजपा सरकारच्या सत्तेतील दोन वर्षांच्या काळात मोठे बदल झाले आहेत. सुशासनाची अंमलबजावणी करताना भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्याची आम्ही शपथ घेतली आहे. ज्या सर्वसामान्य नागरिकांना गेल्या काही वर्षांत फक्त लुटण्यात आले त्यांच्यासाठी आता आशेचा नवा किरण घेऊन आम्ही आलो आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या सकारात्मक कामांना अधोरेखित करत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. निमित्त होते सरकारच्या द्विवर्षपूर्तीचे. काँग्रेसचे नाव न घेता त्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधक अडवणुकीचे धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला. यातील वास्तव काय आहे, हे जाणण्याची क्षमता नागरिकांत आहे, असेही ते म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातील घोटाळ्यांची आठवण करून देत मोदी म्हणाले की, मागील सरकारच्या काळातील कामाच्या तुलनेत लोक आमच्या सरकारच्या विकासकामांकडे पाहत आहेत. जोपर्यंत आम्ही गत सरकारच्या काळातील कामाचा आढावा घेत नाही तोपर्यंत आम्हाला याची जाणीव होणार नाही की, आम्ही किती मोठा टप्पा पूर्ण केला आहे. मी आज देशातील जनतेसमोर समाधानाने उभा आहे. आमच्या कामाचे बारकाईने निरीक्षण होत असूनही आम्ही जनतेचा विश्वास आणि प्रोत्साहन मिळवू शकलो. जनतेचा आमच्यावरील विश्वास दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढत आहे. जे केवळ राजकीय कारणांसाठी आम्हाला विरोध करीत आहेत, त्यांच्याबाबत मी हे म्हणणार नाही; परंतु मी एक म्हणू शकतो की, एका बाजूला विकासवादाचा अजेंडा आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधवाद आहे. आमच्या सरकारने कोणताही निर्णय दुर्भावनायुक्त हेतूने घेतलेला नाही, हे नक्की, असेही मोदी म्हणाले. आमचे सरकार खूप मेहनतीने काम करीत आहे आणि आम्ही केलेल्या कामातून जनतेचा विश्वासही तेवढाच मिळत आहे. देशाचे हित हेच आमचे सर्वोच्च ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करीत राहणार. हे मात्र खरे आहे की, ज्यांनी जनतेचा पैसा आपल्या खिशात घातला ते अडचणीत येतील व त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल. अर्थात, ते कुणी खिशात घातले आणि केव्हा घातले, याला माझ्यालेखी काहीही महत्त्व नाही; परंतु हा जनतेचा पैसा होता आणि तो इतरत्र कुठेही जाऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले.विविध कार्यक्रम, प्रकल्पांमधून इतरत्र जाणारा पैसा वाचवून आम्ही ३६ हजार कोटी रुपयांची बचत केली आहे. ज्यांनी एकेकाळी या भ्रष्टाचाराचा मलिदा लाटला, ते मात्र दुखावले गेले आहेत. काही लोक मला म्हणतात की, तुम्ही विरोधकांशी दोन हात करून आणि खूप टीका झेलूनही काम करीतच राहता. ते मला माध्यमांशी जास्त जोडले जाण्याचा आणि संवाद साधण्याचा सल्ला देतात; परंतु मी त्यांना कसे सांगणार की, ज्यांनी ३६ हजार कोटी रुपये लुटले ते आता माझ्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यांनीच जनतेचा पैसा लुबाडला होता. आमचे यश कशात असेल तर आम्ही जनतेचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समर्पित भावनेने काम करीत आहोत.मोदींनी दोन वर्षांत काहीही केले नाही, या काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले की, आमच्या देशातील जनता सत्य शोधून काढण्यास सक्षम आहे. विकासवाद आणि विरोधवाद याची तुलना जनता योग्य पद्धतीने करू शकते. सरकारने उचललेल्या प्रत्येक पावलाची बारकाईने तुलना करावी. देशाला निराशेच्या खाईत टाकले जाईल, असे काहीही केले जाणार नाही, याकडे गांभीर्याने पाहिले जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)तिकडे आत्महत्या, इकडे सेलिब्रेशन... मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी एकीकडे आत्महत्या करीत आहेत आणि केंद्रातील मोदी सरकार दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इंडिया गेटजवळ सेलिब्रेशन करीत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.