शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही आमची भूमिका अगदी स्पष्ट केली..."; बांगलादेशसोबतच्या सीमा वादावर परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 00:17 IST

गेल्या काही दिवसापासून भारत आणि बांगलादेश सीमेवर तणाव सुरू आहे.

गेल्या काही दिवसापासून भारत आणि बांगलादेश सीमेवर तणाव सुरू आहे. दरम्यान, आता परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. यावेळी, भारताने शेजारील देश बांगलादेशसोबत गुन्हेगारीमुक्त सीमा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यामध्ये सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची आणि द्विपक्षीय करारांचे पालन करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषेदत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही आमची भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. आम्ही कार्यवाहक उपउच्चायुक्तांना बोलावून सीमेवरील कुंपणाबाबत आमची भूमिका स्पष्ट केली होती. सीमापार गुन्हेगारी कारवाया, तस्करी आणि मानवी तस्करीला प्रभावीपणे तोंड देऊन बांगलादेशसोबतची सीमा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, सीमा सुरक्षित करण्यासाठी काटेरी तारांचे कुंपण बसवणे, सीमेवर प्रकाशयोजना करणे, तांत्रिक उपकरणे बसवणे आणि गुरांसाठी कुंपण घालणे हे उपाय आहेत. या संदर्भात पूर्वी झालेल्या सर्व समजुती बांगलादेश अशा गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी सहकार्यात्मक दृष्टिकोनातून अंमलात आणेल.

हे विधान भारत सरकारद्वारे बांगलादेशचे कार्यवाहक उच्चायुक्त नूरुल इस्लाम यांना आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण ब्लॉकमध्ये बोलवल्यानंतर करण्यात आले आहे. कारण सुरू असलेल्या सुरक्षा मुद्द्यावरुन चर्चा केली जाऊ शकेल. बैठकीवेळी भारत सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी सर्व उपायांना लागू करण्याचे महत्वावर जोर दिला आहे.

दोन्ही सरकारांनी त्यांच्या आणि त्यांच्या संबंधित सीमा दलांमध्ये, सीमा सुरक्षा दल आणि सीमा रक्षक बांगलादेश यांच्यात स्थापित केलेल्या सीमेवरील कुंपण आणि सुरक्षा उपायांशी संबंधित प्रोटोकॉल आणि करारांचे पालन करण्याची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. काटेरी तारांचे कुंपण बसवणे, सीमेवर प्रकाशयोजना करणे आणि तांत्रिक उपकरणे तैनात करणे यासारख्या उपाययोजनांद्वारे भारताने सीमापार तस्करी, मानवी तस्करी आणि इतर गुन्हेगारी कारवायांचा सामना करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश