शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

'आम्हाला न्याय मिळाला नाही', निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 17:45 IST

आम्ही थकलो आहोत, प्रत्येक पक्ष आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन देतो.

नवी दिल्ली - दिल्लीतील निर्भया हत्याकांडाला जवळपास 7 वर्षे उलटून गेली. पण, अद्यापही आम्हाला न्याय मिळाला नाही, अजूनही आरोपींना शिक्षा झाली नाही. त्यामुळे आम्ही यंदा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे निर्भयाच्या माता-पितांनी म्हटले आहे. आशा देवी आणि बद्रिनाथसिंह यांनी, आरोपींना कधी शिक्षा होणार ? असा प्रश्न विचारला आहे. राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चालू बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्या तरुणीची पीडित आई आशावादी भावनेतून बोलत होती.  

आम्ही थकलो आहोत, प्रत्येक पक्ष आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन देतो. आमच्या मुलीला न्याय मिळेल, असे सांगतात. पण, त्यांची सहानुभूती, त्यांची वचने आणि त्यांची आश्वसने सर्वच खोटं आहे. केवळ मतांसाठी हे भावनिक राजकारण आहे. देशातील रस्त्यावर आजही एखादी मुलगी किंवा स्त्री बिनधास्तपणे चालू-फिरू शकत नाही. स्त्रिया आणि लहान मुले आजही राक्षसी वृत्तीचे शिकार होत आहेत, असे निर्भयाची आई आशा देवी यांनी म्हटले आहे. 

लोकांना आता सिस्टीमवर विश्वासच राहिला नाही. सर्वच पक्षांच्या सरकारांनी सिस्टीमला फेल केले आहे. त्यामुळेच यंदा मी कुठल्याही पक्षाला मतदान करणार नसल्याचे आशा देवी यांनी म्हटले आहे. तसेच, आशा देवी यांचे पती आणि दिवंगत निर्भयाचे वडिल ब्रदीनाथ सिंह यांनीही मतदान करणार नसल्याचे म्हटले आहे. सर्वच पक्ष महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेविषयी बोलतात. मात्र, कुठल्याही पक्षाकडे  यासाठी कोणतीही योजना नाही. शेवटी आमच्याकडे, कष्ट, संघर्ष, एकट्याची लढाई आणि हतबलता याशिवाय काहीही नाही. निवडणुकांवेळी केवळ पोकळ आश्वासने आम्हाला मिळतात. आपल्या स्वार्थासाठी लोकांन वेड्यात काढण्याचे काम या राजकीय पक्षांकडून केले जात असल्याचे बद्रिनाथ सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, देशात लोकसभा निवडणुका रंगात आल्या असून पहिल्या तीन टप्प्यात मतदान पार पडले आहे. दिल्लीत 12 मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कारNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्लीVotingमतदानElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक