शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

आम्हाला सुधारणा नकोत, कृषी कायदेच रद्द करा; सरकार दिशाभूल करीत असल्याचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 06:05 IST

Farmers Protest : सरकारने शेतकरी संघटनांच्या ४० पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रस्तावावर बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर टीममध्ये चर्चा करण्यात आली.

-   विकास झाडे 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावात कायद्यामध्ये ८ सुधारणा करण्याची तयारी दर्शविलेली  आहे. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून, आमच्यावर केंद्र सरकारने लादलेले तिन्ही कृषी कायदे नको आहेत, शिवाय ‘एमएसपी’ कायदा करावा, अशी आमची ठोस मागणी असल्याचे पत्र आज संयुक्त किसान मोर्चातर्फे सरकारला पाठविण्यात आले आहे.सरकारने शेतकरी संघटनांच्या ४० पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रस्तावावर बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर टीममध्ये चर्चा करण्यात आली. तीन तास चाललेल्या या बैठकीत सरकारला उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितले की, सरकार सातत्याने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. आतापर्यंत मंत्रिगटासोबत झालेल्या बैठकीत कायदे मागे घ्यावेत, हीच ठोस भूमिका शेतकऱ्यांनी मांडली होती. सरकारकडून मात्र जे प्रस्ताव येतात, त्यात कायद्यात सुधारणा करण्याबाबत चर्चा करू, असे सांगितले जाते.आंदोलनाच्या २८व्या दिवशीही आंदोलन आक्रमक करण्यावर शेतकरी ठाम असल्याचे दिसून आले. बहुतांश शेतकऱ्यांनी दिवसभर उपवास केला. दुसरीकडे आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन, त्यांना ३,१३,३६३ शेतकऱ्यांचे कायद्याला समर्थन असल्याचे पत्र दिले. या शिष्टमंडळाने एक लाख गावांतून या स्वाक्षऱ्या गोळा केल्या असल्याचा दावाही केला आहे.  

रक्ताने लिहिले पत्र!तराई किसान संघटनेचे अध्यक्ष तजिंदर सिंह यांनी मंगळवारी रक्ताने पत्र लिहून एक दिवस उपवास करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यास बुधवारी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.

आय लव्ह किसान!आज शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांवर ‘आय लव्ह किसान’ लिहिलेले स्टिकर लावण्यात आले. विजय हिंदुस्थानी यांनी शामली ते युपी गेटपर्यंत कडाक्याच्या थंडीत अंगावरील शर्ट काढून छातीवर हे स्टिकर लावून लक्ष वेधले.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घ्या! - स्टॅलिनशेतकरी महिन्याभरापासून थंडीत आंदोलन करीत आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यायला पाहिजे होते, याकडे डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी लक्ष वेधले.

टीएमसीचे खासदार सिंघू सीमेवर!  प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाच खासदारांचे शिष्टमंडळ सिंघू सीमेवर पाठविले. यात डेरेक ओ ब्रायन, शताब्दी रॉय, प्रसून बॅनर्जी, प्रतिमा मंडल आणि मोहम्मद नदीमुल हक यांचा समावेश होता.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली