शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही मुद्दाम टिप्पणी केली नाही, राम-रहीमप्रकरणी माध्यमांना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 02:33 IST

चंदीगड : पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही जाणूनबुजून टिप्पणी केली नव्हती. प्रसारमाध्यमांनी आमचे मत चुकीच्या पद्धतीने मांडले, असे हरियाणा व पंजाब उच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे, असेही हायकोर्टाने नमूद केले आहे.राम-रहीमला गेल्या आठवड्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचारावरून पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला फटकारले होते. पंतप्रधान नरेंद्र ...

चंदीगड : पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही जाणूनबुजून टिप्पणी केली नव्हती. प्रसारमाध्यमांनी आमचे मत चुकीच्या पद्धतीने मांडले, असे हरियाणा व पंजाब उच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे, असेही हायकोर्टाने नमूद केले आहे.राम-रहीमला गेल्या आठवड्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचारावरून पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला फटकारले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे नव्हे, तर देशाचे पंतप्रधान आहेत. मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत, भाजपचे नव्हेत, अशा शब्दांत सरकारला सुनावले होते. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पुन्हा झाली. त्यावेळी मुख्य न्यायाधीश एस.एस. सरोन यांनी सरकारच्या वकिलांना सांगितले की, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याविरोधात न्यायालयाने जाणूनबुजून टिप्पणी केली नव्हती. न्यायालयाला राजकारणापासून लांब राहायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायाधीशांनी प्रसारमाध्यमांनाही सुनावले. ‘आम्ही व्यक्त केलेले मत चुकीच्या पद्धतीने बातमीत मांडू नका. आम्ही निकालपत्रात जो निकाल देतो, त्याचा उल्लेख बातमीत करा. आम्ही सुनावणीच्या वेळी मांडलेले मत हा चर्चेचा भाग असतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे,’ असे न्यायालयाने सांगितले. ‘या प्रकरणात माध्यमांनी जबाबदारीने काम केलेले नाही. आमचे मत चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले’ असेही मुख्य न्यायाधीशांनी सांगितले. (वृत्तसंस्था)देश कोणाही पक्षाचा नाहीडेरा सच्चा सौदाच्या समर्थकांनी हरियाणामध्ये हैदोस घातला होता, यावरून न्यायालयाने गेल्या आठवड्यात सरकारी वकिलांना धारेवर धरले होते. राष्ट्रीय एकात्मता आणि कायदा व सुव्यवस्था यांचे पालन महत्त्वाचे आहे. देश कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. पंजाब व हरियाणा ही वसाहत असल्यासारखे वागू शकत नाही, असेही न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते.

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमCourtन्यायालय