शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

West Bengal: “ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं”; अलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 21:29 IST

West Bengal: केंद्राने अलपन बंडोपाध्याय यांना नोटीस बजावली होती.

ठळक मुद्देलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तरममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं - बंडोपाध्याय

कोलकाता:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मुख्य सचिव अलपन यांना केंद्रात परत येण्याचे आदेश देत बदली केली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळत अलपन बंडोपाध्याय यांना आपला मुख्य सल्लागार बनविण्याची घोषणा केली. यावरून केंद्राने अलपन बंडोपाध्याय यांना नोटीस बजावली होती. ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं, असं उत्तर अलपन बंडोपाध्याय यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. (former chief secretary alapan bandyopadhyay has replied to show cause notice issued by centre govt)

अलपन बंडोपाध्याय ३१ मे पासून सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना असेच सोडणार नाही. सेवानिवृत्त झाले असले तरी, ते दिल्लीला जाणार नाहीत, ते आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील. अलपन बंडोपाध्याय १ जूनपासून मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. यानंतर केंद्र सरकारने बंडोपाध्याय यांना नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. 

ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलपन बंडोपाध्याय यांनी केंद्राच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जसे सांगितले तसेच केले. समीक्षा बैठकीसंदर्भात बोलताना अलपन बंडोपाध्याय यांनी सांगितले की, त्या दिवशी ते ममता बॅनर्जी यांच्यासोबत होते आणि उत्तर तसेच दक्षिण २४ परगणा भागाचे हवाई सर्वेक्षण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या परवानगीने दिघा येथे गेले होते, असे बंडोपाध्याय यांनी नोटिसीला दिलेल्या उत्तरात म्हटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आलेल्या यास चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी अर्धा तास उशिरा हजेरी लावली. तसेच अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या कार्यक्रमात जायचे आहे, असे सांगून निघून गेल्या होत्या. परिणामी केंद्र सरकारने मुख्य सचिव अलपन यांना केंद्रात परत येण्याचे आदेश देत बदली केली होती. मात्र, आता त्यांची केंद्रात बदली होऊ द्यायची नाही, यासाठी ममता बॅनर्जी यांनी नवी खेळी खेळल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण