शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal: “ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं”; अलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 21:29 IST

West Bengal: केंद्राने अलपन बंडोपाध्याय यांना नोटीस बजावली होती.

ठळक मुद्देलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तरममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं - बंडोपाध्याय

कोलकाता:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मुख्य सचिव अलपन यांना केंद्रात परत येण्याचे आदेश देत बदली केली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळत अलपन बंडोपाध्याय यांना आपला मुख्य सल्लागार बनविण्याची घोषणा केली. यावरून केंद्राने अलपन बंडोपाध्याय यांना नोटीस बजावली होती. ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं, असं उत्तर अलपन बंडोपाध्याय यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. (former chief secretary alapan bandyopadhyay has replied to show cause notice issued by centre govt)

अलपन बंडोपाध्याय ३१ मे पासून सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना असेच सोडणार नाही. सेवानिवृत्त झाले असले तरी, ते दिल्लीला जाणार नाहीत, ते आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील. अलपन बंडोपाध्याय १ जूनपासून मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. यानंतर केंद्र सरकारने बंडोपाध्याय यांना नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. 

ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलपन बंडोपाध्याय यांनी केंद्राच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जसे सांगितले तसेच केले. समीक्षा बैठकीसंदर्भात बोलताना अलपन बंडोपाध्याय यांनी सांगितले की, त्या दिवशी ते ममता बॅनर्जी यांच्यासोबत होते आणि उत्तर तसेच दक्षिण २४ परगणा भागाचे हवाई सर्वेक्षण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या परवानगीने दिघा येथे गेले होते, असे बंडोपाध्याय यांनी नोटिसीला दिलेल्या उत्तरात म्हटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आलेल्या यास चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी अर्धा तास उशिरा हजेरी लावली. तसेच अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या कार्यक्रमात जायचे आहे, असे सांगून निघून गेल्या होत्या. परिणामी केंद्र सरकारने मुख्य सचिव अलपन यांना केंद्रात परत येण्याचे आदेश देत बदली केली होती. मात्र, आता त्यांची केंद्रात बदली होऊ द्यायची नाही, यासाठी ममता बॅनर्जी यांनी नवी खेळी खेळल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण