शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

भूस्खलनात शेजारी, नातेवाईक वाहून गेले; पत्नीच्या भीतीमुळे 'असा' वाचला संपूर्ण कुटुंबाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 13:24 IST

वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत १५३ लोकांचा मृत्यू झाला असून १००० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.

केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत १५३ लोकांचा मृत्यू झाला असून १००० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. याच दरम्यान एक कुटुंब असंही आहे जे दुर्घटनेपूर्वीच घरातून बाहेर पडले होते, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. शकीरा नावाच्या महिलेला भीती वाटत होती त्यामुळे तिचं संपूर्ण कुटुंब वाचलं आहे. भूस्खलनामुळे वायनाडच्या चुरलमाला, मुंदक्कई, अट्टामाला आणि नूलपुझा भागात प्रचंड विध्वंस झाला आहे.

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मंगळवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं. याआधी सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता. मुसळधार पावसामुळे मुंदक्कई येथे राहणाऱ्या शकीरा नावाच्या महिलेच्या मनात भीती निर्माण झाली. यानंतर तिने पतीला आपली अस्वस्थता सांगितली आणि मुंदक्कई सोडून मेप्पडी येथील आपल्या घरी जाण्यास सांगितलं. 

सुरुवातीला शकीराचा पती मोहम्मद अलीसने नकार दिला, पण नंतर होकार दिला. यानंतर शकीरा पती, मुलं आणि सासरच्या मंडळींसह मेप्पडी येथे गेली. शकीरा आणि तिच्या कुटुंबाने मुंडक्काई सोडल्यानंतर अवघ्या काही तासातच, परिसरात ही घटना घडली आणि केवळ तिचे शेजारीच नाही तर जवळचे नातेवाईकही वाहून गेले. भूस्खलनात तिचं घरही पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण, शकीराच्या भीतीने तिचा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचला.

शकीराच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून आमच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री पाऊस पडला तेव्हा माझी पत्नी घाबरली. काळजी करण्यासारखं काही नाही असं आम्ही तिला सांगितलं तरी तिने मेप्पडीला जाण्याचा आग्रह धरला. शेवटी आम्ही निघालो. काही तासांनंतर या भागात भूस्खलन झालं. आता फक्त माझं घर उरले आहे, पण ते चिखलाने भरलेलं आहे. जवळचे नातेवाईक आणि शेजारी अजूनही बेपत्ता आहेत. 

टॅग्स :Keralaकेरळlandslidesभूस्खलन