शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

तामिळनाडूच्या पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर

By admin | Updated: December 6, 2015 03:31 IST

तामिळनाडूतील पूरग्रस्त क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून चेन्नईत शनिवारी दूरसंचार आणि रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतूकही रुळावर येत आहे.

चेन्नई : तामिळनाडूतील पूरग्रस्त क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून चेन्नईत शनिवारी दूरसंचार आणि रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतूकही रुळावर येत आहे. परंतु काही भागात अजूनही पाणी साचले आहे.दरम्यान लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी आज शहर आणि त्यालगतच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली आणि प्रशासनाला गरज वाटेल तोपर्यंत लष्कराचे बचाव अभियान सुरूच राहील, असे आश्वासन दिले. सरकारच्या माहितीनुसार १ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने किमान २४५ लोकांचा बळी घेतला. मंगळवारी शहरातील काही भागात पूर आल्याने परिस्थिती चिघळली होती. पुरामुळे रस्ते, रेल्वेमार्ग उद्ध्वस्त झाले तर विमानतळही बंद करावे लागले होते. विद्युत आणि दूरध्वनी सेवा ठप्प पडून लाखो लोक अडकले होते. कोट्टापुरम, मुदीचुर आणि पल्लीक्करनईसारखे अनेक भाग अजूनही पाण्याखालीच असून असंख्य नागरिक घरांच्या छतावर आश्रयाला आहेत. दरम्यान शहरातील काही एटीएम आणि पेट्रोलपंप सुरू झाले असून तेथे लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. इंधन पुरवठा पुढील दोन दिवसात सामान्य होईल तसेच रविवारी राज्यांमधील बँका सुरू राहतील,अशी ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. (वृत्तसंस्था)एनडीआरएफने १६,००० लोकांना वाचविले तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि राज्याच्या अन्य भागात आलेल्या पुरात मदत आणि बचाव मोहिमेअंतर्गत एनडीआरएफने आतापर्यंत १६,००० वर लोकांचे जीव वाचविले असल्याचे दलातर्फे सांगण्यात आले. दलाच्या २०० नौकांसह ५० पथके बचाव कार्य करीत आहेत.दलाचे महासंचालक ओ.पी. सिंग यांनी सांगितले की, २० नवी पथके बचाव कार्यात सहभागी करण्यात आली असून जवळपास १६०० जवान हे कार्य करीत आहेत. लष्कराने ५,५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविलेलष्कराने आतापर्यंत ५,५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असून तांब्रम, उरापक्कम, मन्निवक्कम, मुदीचेऊर आणि इतर क्षेत्रात लष्कराची ५० पथके बचाव कार्यात सहभागी झाली आहेत. विमानतळावरून तांत्रिक उड्डाणे सुरूपुरात वेढलेल्या चेन्नई विमानतळावरून तांत्रिक उड्डाणे सुरू झाली आहेत. पुरामुळे येथील हवाई वाहतूक बुधवारपासून बंद होती. प्रवासी विमानसेवा सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली.विमानतळाच्या तळघरात अजूनही पाणी साचले असून टर्मिनल इमारतीतील विद्युत पुरवठा अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही.