शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

तामिळनाडूच्या पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर

By admin | Updated: December 6, 2015 03:31 IST

तामिळनाडूतील पूरग्रस्त क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून चेन्नईत शनिवारी दूरसंचार आणि रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतूकही रुळावर येत आहे.

चेन्नई : तामिळनाडूतील पूरग्रस्त क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून चेन्नईत शनिवारी दूरसंचार आणि रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतूकही रुळावर येत आहे. परंतु काही भागात अजूनही पाणी साचले आहे.दरम्यान लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी आज शहर आणि त्यालगतच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली आणि प्रशासनाला गरज वाटेल तोपर्यंत लष्कराचे बचाव अभियान सुरूच राहील, असे आश्वासन दिले. सरकारच्या माहितीनुसार १ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने किमान २४५ लोकांचा बळी घेतला. मंगळवारी शहरातील काही भागात पूर आल्याने परिस्थिती चिघळली होती. पुरामुळे रस्ते, रेल्वेमार्ग उद्ध्वस्त झाले तर विमानतळही बंद करावे लागले होते. विद्युत आणि दूरध्वनी सेवा ठप्प पडून लाखो लोक अडकले होते. कोट्टापुरम, मुदीचुर आणि पल्लीक्करनईसारखे अनेक भाग अजूनही पाण्याखालीच असून असंख्य नागरिक घरांच्या छतावर आश्रयाला आहेत. दरम्यान शहरातील काही एटीएम आणि पेट्रोलपंप सुरू झाले असून तेथे लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. इंधन पुरवठा पुढील दोन दिवसात सामान्य होईल तसेच रविवारी राज्यांमधील बँका सुरू राहतील,अशी ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. (वृत्तसंस्था)एनडीआरएफने १६,००० लोकांना वाचविले तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि राज्याच्या अन्य भागात आलेल्या पुरात मदत आणि बचाव मोहिमेअंतर्गत एनडीआरएफने आतापर्यंत १६,००० वर लोकांचे जीव वाचविले असल्याचे दलातर्फे सांगण्यात आले. दलाच्या २०० नौकांसह ५० पथके बचाव कार्य करीत आहेत.दलाचे महासंचालक ओ.पी. सिंग यांनी सांगितले की, २० नवी पथके बचाव कार्यात सहभागी करण्यात आली असून जवळपास १६०० जवान हे कार्य करीत आहेत. लष्कराने ५,५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविलेलष्कराने आतापर्यंत ५,५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असून तांब्रम, उरापक्कम, मन्निवक्कम, मुदीचेऊर आणि इतर क्षेत्रात लष्कराची ५० पथके बचाव कार्यात सहभागी झाली आहेत. विमानतळावरून तांत्रिक उड्डाणे सुरूपुरात वेढलेल्या चेन्नई विमानतळावरून तांत्रिक उड्डाणे सुरू झाली आहेत. पुरामुळे येथील हवाई वाहतूक बुधवारपासून बंद होती. प्रवासी विमानसेवा सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली.विमानतळाच्या तळघरात अजूनही पाणी साचले असून टर्मिनल इमारतीतील विद्युत पुरवठा अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही.