शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

विजेच्या लपंडावाने पाणीटंचाई

By admin | Updated: April 28, 2017 02:11 IST

येथील नागरिकांना वीज वितरणच्या अवकृपेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

दुर्लक्ष : कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने उपकरणात बिघाड चिकणी(जामणी) : येथील नागरिकांना वीज वितरणच्या अवकृपेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विजेच्या लपंडावामुळे नळयोजनेच्या मोटरपंपात बिघाड येऊन चार दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. येथे विजेचा दाब कमीअधिक होत असतो. त्यात वारंवार वीज खंडित होऊन पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेच्या पंप जळाला. त्यामुळे पाण्याची टाकी भरली नसून चार दिवसांपासून नळाला पाणी नव्हते. ग्रामपंचायतने त्वरीर दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरळीत केला.(वार्ताहर) वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने ग्रामस्थ त्रस्त विरूळ (आकाजी) - वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. परिसरातील वीज पुरवठा वेळीअवेळी खंडित होतो. त्यामुळे भारनियमन नसताना ग्रामस्थांना उकाडा सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. वीज वितरण कंपनीच्या बेताल कारभाराचा फटका येथील ग्रामस्थांना सहन करावा लागत असून येथील कार्यालयात कर्मचारी संख्या कमी आहे. अशात यंत्रणेत काही बिघाड झाल्यास दोन-तीन तास तो सुरळीत होत नाही. विरूळ येथील वायरमन सेवानिवृत्त झाल्यावर येथे अन्य कर्मचारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे साधारण बिघाड झाल्यावर अन्य गावातून कर्मचारी येण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागते. येथील वीज पुरवठा कधीही खंडित होत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याबाबत अभियंता कळसकर यांना निवेदन सादर करण्यात आले.(वार्ताहर)