शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कंधारात ८० गावांत बसणार जलशुद्धीकरण यंत्र

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून ग्रामस्थांचे आरोग्य फुलणार, फ्लोराईडयुक्त पाण्यापासून अनेक गावांची सुटका

मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून ग्रामस्थांचे आरोग्य फुलणार, फ्लोराईडयुक्त पाण्यापासून अनेक गावांची सुटका
कंधार : अशुद्ध पाण्यावर ग्रामस्थ तहान भागवितात़ त्यामुळे रोगराईचा सामना करावा लागतो़ जलशुद्धीकरण यंत्र ८० गावांत बसविण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून आरोग्य फुलणार असून फ्लोराईडयुक्त पाणी सेवन करणार्‍या अनेक गावांची आता सुटका होणार असल्याचे समोर आले आहे़
दूषित पाण्याने कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड, त्वचा, विषाणूजन्य आजार, घसादुखी आदी रोगाचा प्रखरपणे सामना करावा लागतो़ त्यात पुन्हा जमिनीतील खोलवरचे पाणी व फ्लोराईडयुक्त असेल तर दंत व अस्थीविकाराचा सामना करावा लागतो़ अशा स्थितीत शेती करण्यास मोठी अडचण निर्माण होते़ आरोग्यमय जीवनासाठी शुद्ध पाणी असणे गरजेचे आहे़ २०१४-१५ मधील मागासक्षेत्र विकास आराखडा पंचायत समितीने प्रस्तावित केला होता़ त्याला मंजुरी मिळाली आहे़ निधी टप्प्याटप्प्याने मिळतो़
शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी औराळ येथे ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार आहेत़ बाभूळगाव, बाचोटी, भुत्याचीवाडी, बिजेवाडी, बोरी खु़, चिखलभोसी, चिंचोली (प़क़), चौकीधर्मापुरी, दिग्रस बु़, गांधीनगर, गऊळ, घागरदरा, घोडज, घुबडवाडी, गोगदरी, गोणार, गुंटूर, हाडोळी (ब्र), हाळदा, हटक्याळ, हिप्परगा (शहा), इमामवाडी, जाकापूर, जंगमवाडी, कल्हाळी, कौठा, खंडगाव (ह़), लाडका, लालवाडी, महालिंगी, मजरे धर्मापुरी, मंगलसांगवी, मंगनाळी, मानसिंगवाडी, मरशिवणी, मसलगा, मुंडेवाडी, नागलगाव, नंदनशिवणी, नवरंगपुरा, पानभोसी, पांगरा, पानशेवडी, पाताळगंगा, पेठवडज, पोखर्णी, रहाटी, रामानाईकतांडा, राऊतखेडा, संगमवाडी, संगुचीवाडी, शिराढेण, शिरसी बु़, शिरसी खु़, शिरूर, सोमठाणा, तेलूर, उमरगा (खो़), वहाद, वाखरड, वरवंट, येलूर, बारूळ, बोळका, बामणी (पक), बहाद्दरपुरा, बोरी बु़, चिखली, धानोरा कौठा, कुरुळा, मानसपुरी, फुलवळ, रूई, शेकापूर, उमरज, उस्माननगर, तेलंगवाडी या गावांचा समावेश आहे़ प्रतयेक गावांत ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्राची त्यातून सोय होणार आहे़
हा आराखडा सर्वसाधारण व अनु़जाती-जमाती आदी वर्गांना उपयुक्त रहावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले़ लोकसंख्येच्या प्रमाणात वर्षाला निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे़ त्यामुळे कामे अर्धवट राहण्याचाही धोका आहे़ तसेच पाणीस्त्रोत्र बळकट आहे का, पाणीस्त्रोत्र मुबलक उपलब्ध आहे का, याची स्थानिक प्रशासनाने शहानिशा करण्याचे मोठे आव्हान आहे़ ५०० लिटर प्रतिघंटा आणि १ हजार लि़प्रतिघंटा पाणी शुद्ध मिळणार आहे़ त्यासाठी ग्रामस्थांना अत्यल्प दरात पाणी मिळेल़