शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात ८० गावांत बसणार जलशुद्धीकरण यंत्र

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून ग्रामस्थांचे आरोग्य फुलणार, फ्लोराईडयुक्त पाण्यापासून अनेक गावांची सुटका

मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून ग्रामस्थांचे आरोग्य फुलणार, फ्लोराईडयुक्त पाण्यापासून अनेक गावांची सुटका
कंधार : अशुद्ध पाण्यावर ग्रामस्थ तहान भागवितात़ त्यामुळे रोगराईचा सामना करावा लागतो़ जलशुद्धीकरण यंत्र ८० गावांत बसविण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून आरोग्य फुलणार असून फ्लोराईडयुक्त पाणी सेवन करणार्‍या अनेक गावांची आता सुटका होणार असल्याचे समोर आले आहे़
दूषित पाण्याने कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड, त्वचा, विषाणूजन्य आजार, घसादुखी आदी रोगाचा प्रखरपणे सामना करावा लागतो़ त्यात पुन्हा जमिनीतील खोलवरचे पाणी व फ्लोराईडयुक्त असेल तर दंत व अस्थीविकाराचा सामना करावा लागतो़ अशा स्थितीत शेती करण्यास मोठी अडचण निर्माण होते़ आरोग्यमय जीवनासाठी शुद्ध पाणी असणे गरजेचे आहे़ २०१४-१५ मधील मागासक्षेत्र विकास आराखडा पंचायत समितीने प्रस्तावित केला होता़ त्याला मंजुरी मिळाली आहे़ निधी टप्प्याटप्प्याने मिळतो़
शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी औराळ येथे ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार आहेत़ बाभूळगाव, बाचोटी, भुत्याचीवाडी, बिजेवाडी, बोरी खु़, चिखलभोसी, चिंचोली (प़क़), चौकीधर्मापुरी, दिग्रस बु़, गांधीनगर, गऊळ, घागरदरा, घोडज, घुबडवाडी, गोगदरी, गोणार, गुंटूर, हाडोळी (ब्र), हाळदा, हटक्याळ, हिप्परगा (शहा), इमामवाडी, जाकापूर, जंगमवाडी, कल्हाळी, कौठा, खंडगाव (ह़), लाडका, लालवाडी, महालिंगी, मजरे धर्मापुरी, मंगलसांगवी, मंगनाळी, मानसिंगवाडी, मरशिवणी, मसलगा, मुंडेवाडी, नागलगाव, नंदनशिवणी, नवरंगपुरा, पानभोसी, पांगरा, पानशेवडी, पाताळगंगा, पेठवडज, पोखर्णी, रहाटी, रामानाईकतांडा, राऊतखेडा, संगमवाडी, संगुचीवाडी, शिराढेण, शिरसी बु़, शिरसी खु़, शिरूर, सोमठाणा, तेलूर, उमरगा (खो़), वहाद, वाखरड, वरवंट, येलूर, बारूळ, बोळका, बामणी (पक), बहाद्दरपुरा, बोरी बु़, चिखली, धानोरा कौठा, कुरुळा, मानसपुरी, फुलवळ, रूई, शेकापूर, उमरज, उस्माननगर, तेलंगवाडी या गावांचा समावेश आहे़ प्रतयेक गावांत ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्राची त्यातून सोय होणार आहे़
हा आराखडा सर्वसाधारण व अनु़जाती-जमाती आदी वर्गांना उपयुक्त रहावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले़ लोकसंख्येच्या प्रमाणात वर्षाला निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे़ त्यामुळे कामे अर्धवट राहण्याचाही धोका आहे़ तसेच पाणीस्त्रोत्र बळकट आहे का, पाणीस्त्रोत्र मुबलक उपलब्ध आहे का, याची स्थानिक प्रशासनाने शहानिशा करण्याचे मोठे आव्हान आहे़ ५०० लिटर प्रतिघंटा आणि १ हजार लि़प्रतिघंटा पाणी शुद्ध मिळणार आहे़ त्यासाठी ग्रामस्थांना अत्यल्प दरात पाणी मिळेल़