शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

टीआरएसच्या उत्साहावर एक्झिट पोलमुळे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:09 IST

मोदींबाबतचे आडाखे चुकल्याची भावना

हैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या निकालांत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा सत्तेवर येणार असा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून व्यक्त झाल्याने, तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) छावणीत निराशा पसरली आहे. निकालानंतर अधांतरी लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी पूर्वतयारी करत असलेल्या या पक्षाच्या उत्साहावरच पाणी पडले आहे.

टीआरएसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, लोकसभा निवडणुकांत यूपीए किंवा एनडीए यापैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही, असे आम्हाला वाटत होते. मात्र, एक्झिट पोलचे निष्कर्ष पाहाता, आमचा विचार चुकीचा ठरेल, असे दिसत आहे. भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे काँग्रेस व भाजपला वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याचे स्वप्न विरून जाईल, असे दिसते.

तेलंगणामध्ये लोकसभेच्या१७ जागा आहेत. निवडणूक निकालानंतर टीआरएस राष्ट्रीय राजकारणात मोलाची भूमिका बजावणार, असे दावे केले जात होते. प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याची कल्पना केसीआर यांनी गेल्या वर्षी मांडली होती. त्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, नवीन पटनायक, एच. डी. देवेगौडा आदी नेत्यांची भेट घेतली होती, पण त्या प्रयत्नांनाअर्थच राहणार नाही, असे दिसतआहे. (वृत्तसंस्था)स्थिती पाहूनच निर्णयटीआरएसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत, तर तो पक्ष सरकार स्थापनेचा दावाही करू शकणार नाही. एनडीए व यूपीए यापैकी कोणीही सरकार स्थापनेसाठी टीआरएसशी संपर्क साधला, तर त्या वेळची स्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येईल.