शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

टीआरएसच्या उत्साहावर एक्झिट पोलमुळे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:09 IST

मोदींबाबतचे आडाखे चुकल्याची भावना

हैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या निकालांत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा सत्तेवर येणार असा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून व्यक्त झाल्याने, तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) छावणीत निराशा पसरली आहे. निकालानंतर अधांतरी लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी पूर्वतयारी करत असलेल्या या पक्षाच्या उत्साहावरच पाणी पडले आहे.

टीआरएसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, लोकसभा निवडणुकांत यूपीए किंवा एनडीए यापैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही, असे आम्हाला वाटत होते. मात्र, एक्झिट पोलचे निष्कर्ष पाहाता, आमचा विचार चुकीचा ठरेल, असे दिसत आहे. भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे काँग्रेस व भाजपला वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याचे स्वप्न विरून जाईल, असे दिसते.

तेलंगणामध्ये लोकसभेच्या१७ जागा आहेत. निवडणूक निकालानंतर टीआरएस राष्ट्रीय राजकारणात मोलाची भूमिका बजावणार, असे दावे केले जात होते. प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याची कल्पना केसीआर यांनी गेल्या वर्षी मांडली होती. त्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, नवीन पटनायक, एच. डी. देवेगौडा आदी नेत्यांची भेट घेतली होती, पण त्या प्रयत्नांनाअर्थच राहणार नाही, असे दिसतआहे. (वृत्तसंस्था)स्थिती पाहूनच निर्णयटीआरएसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत, तर तो पक्ष सरकार स्थापनेचा दावाही करू शकणार नाही. एनडीए व यूपीए यापैकी कोणीही सरकार स्थापनेसाठी टीआरएसशी संपर्क साधला, तर त्या वेळची स्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येईल.