शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

पाण्याची नासाडी थांबणार...

By admin | Updated: May 16, 2016 00:44 IST

गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या जुन्या पाईपलाईन व व्हॉल्व्हमुळे ही गळती होऊन तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स अमूल्य पाणी अक्षरश: वाया जात होते. पाण्याची ही नासाडी रोखण्यासाठी जैन इरिगेशनच्या बांधकाम विभागाचे सहकारी कार्यरत आहेत. गळती रोखण्यासाठी जुनी पाईपलाईन, व्हॉल्व्ह आहे त्याच ठिकाणी ठेऊन झाकण बसविणे, पाणी गळती होऊ नये यासाठी त्यावर वॉटरफ्रुफ काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामात जैन इरिगेशनचे पोकलेन्स, डंपर, अभियंते, सहकारी गेल्या तीन दिवसांपासून व्यस्त असून दोन-तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे. स्

गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या जुन्या पाईपलाईन व व्हॉल्व्हमुळे ही गळती होऊन तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स अमूल्य पाणी अक्षरश: वाया जात होते. पाण्याची ही नासाडी रोखण्यासाठी जैन इरिगेशनच्या बांधकाम विभागाचे सहकारी कार्यरत आहेत. गळती रोखण्यासाठी जुनी पाईपलाईन, व्हॉल्व्ह आहे त्याच ठिकाणी ठेऊन झाकण बसविणे, पाणी गळती होऊ नये यासाठी त्यावर वॉटरफ्रुफ काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामात जैन इरिगेशनचे पोकलेन्स, डंपर, अभियंते, सहकारी गेल्या तीन दिवसांपासून व्यस्त असून दोन-तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे. सामाजिक बांधिलकी मानून जैन इरिगेशनने मेहरुण तलावाची गळती रोखण्यासाठी कृतीशील पाऊल उचलून प्रत्यक्ष काम सुरू केले. याबाबत महापौर नितीन ल‹ा यांनी जैन इरिगेशनच्या या कार्याचे स्वागत केले.

गळतीची पाहणी....
जैन इरिगेशनने युद्धपातळीवर कामाच्या नियोजनुसार प्राथमिक काम तीन दिवसांत पूर्ण केले आहे. आता गळती रोखण्याच्या उपाययोजना १६ पासून करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसांत गळती संपूर्णपणे बंद होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया न जाता तलावातच थांबेल अशी माहिती जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कामाची पाहणी करताना दिली. त्यांच्यासमवेत महापौर नितीन ल‹ा, क्रेडाईचे अध्यक्ष अनिष शहा, जळगाव सिव्हिल इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष भरत अमळकर, सभापती नितीन बरडे आदी उपस्थित होते.

या कामामुळे आता येत्या दोन तीन दिवसांत गळती संपूर्णपणे बंद होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया न जाता तलावातच थांबेल.
-अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन.

ब्रिटीश काळात पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेली ही योजना होती. तलावातील पाणी गोळा करण्याचा विहीर सदृष्य तो एक खड्डा आहे. तो एक प्रकारचा जॅकवेलच असून पाणी उचलण्यासाठी त्याचा वापर होतो.
-भरत अमळकर, अध्यक्ष, जळगाव सिव्हिल इंजिनियर असोसिएशन.


ब्रिटीश काळातील पाणीपुरवठा योजनेचा हा एक भाग असावा. त्याला सम्प अथवा चेंबर असेही म्हणता येईल.
- अनिष शहा, अध्यक्ष, क्रेडाई