शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘काझीरंगा’त पाणी शिरले; २३ प्राण्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:53 IST

आसाममध्ये महापुरामुळे ४३० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील ९० टक्के भागात पाणी शिरले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये महापुरामुळे ४३० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील ९० टक्के भागात पाणी शिरले आहे. गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील सर्व प्राणी या जलप्रलयापासून जीव बचावण्याकरिता उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत. मात्र, या प्रयत्नात शनिवारपासून आतापर्यंत २३ प्राणी मरण पावले आहेत.आसाम आणि बिहारमध्ये पुराने कहर केला असून पूर आणि संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात मुसळधार पावसाने आतापर्यंत १४ लोकांचा बळी घेतला आहे.सुरक्षित जागी जाण्यासाठी प्राणी करत असलेला प्रवासही धोकादायक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७ चा सुमारे ६० किमीचा पट्टा हा काझीरंगा अभयारण्यातून जातो. या महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला उंच ठिकाणी कारबी अँगलाँगचा जिल्ह्याचा परिसर आहे. काझीरंगातील हत्ती, हरणे मोठ्या संख्येने हा महामार्ग ओलांडून कारबी अँगलाँगमध्ये जात आहेत. या अभयारण्याला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. त्यामुळे मोठे नुकसान होते. काझीरंगातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील हलक्या वजनाच्या वाहनांची वाहतूक नागाव जिल्हा प्रशासनाने तात्पुरती थांबविली आहे. अभयारण्यातील प्राणी महामार्ग ओलांडून ज्या मार्गाने कारबी अँगलाँगला जात आहेत त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिरिक्त १०० वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. या प्राण्यांना विनाअडथळा तेथून जाता यावे व तसेच गेंड्यांसह इतर प्राण्यांची कोणी अवैध शिकार करू नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. याच मार्गावरून जाताना काही प्राणी मरण पावले आहेत. (वृत्तसंस्था)>मोठ्या संख्येने गेंडे, रानम्हशी अडकल्याआसाम सरकारचे जलस्रोत खात्याचे मंत्री केशब महंत यांनी सांगितले की, काझीरंगा अभयारण्यामध्ये असलेल्या उंच ठिकाणांमुळे तेथील प्राण्यांचा जीव बचावण्यास मदत झाली आहे. तेथील परिस्थितीवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहे व लागेल ती मदत तात्काळ पुरविण्यात येत आहे. काझीरंगा अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापुरामुळे या अभयारण्यात मोठ्या संख्येने गेंडे व रानम्हशी अजूनही अडकलेल्या आहेत.>आसामला सर्वतोपरी मदत : मोदीगुवाहाटी : आसाममधील सध्याच्या पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्यात पूर आणि दरडी कोसळून १५ जणांचे प्राण गेले असून, ४६ लाख लोकांना फटका बसला आहे.राज्यातील ३० जिल्ह्यांतील पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती सोनोवाल यांनी मोदी यांना दिली, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे. आसामच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अधिकाºयाने सांगितले की, सोमवार दुपारपर्यंत ४,१७५ खेड्यांतील ४६.२८ लाख लोकांना व जवळपास ९० हजार हेक्टर्सवर शेतजमिनीला फटका बसला आहे. काही शेतात तर पीकही उभे होते. पूरग्रस्त भागात लोकांना मदत आणि साह्यासाठी सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांत लष्करालाही बोलावले आहे. १० लाखांपेक्षा जास्त प्राण्यांनाही पुराचा फटका बसला आहे.

टॅग्स :floodपूर