शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

‘काझीरंगा’त पाणी शिरले; २३ प्राण्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:53 IST

आसाममध्ये महापुरामुळे ४३० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील ९० टक्के भागात पाणी शिरले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये महापुरामुळे ४३० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील ९० टक्के भागात पाणी शिरले आहे. गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील सर्व प्राणी या जलप्रलयापासून जीव बचावण्याकरिता उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत. मात्र, या प्रयत्नात शनिवारपासून आतापर्यंत २३ प्राणी मरण पावले आहेत.आसाम आणि बिहारमध्ये पुराने कहर केला असून पूर आणि संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात मुसळधार पावसाने आतापर्यंत १४ लोकांचा बळी घेतला आहे.सुरक्षित जागी जाण्यासाठी प्राणी करत असलेला प्रवासही धोकादायक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७ चा सुमारे ६० किमीचा पट्टा हा काझीरंगा अभयारण्यातून जातो. या महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला उंच ठिकाणी कारबी अँगलाँगचा जिल्ह्याचा परिसर आहे. काझीरंगातील हत्ती, हरणे मोठ्या संख्येने हा महामार्ग ओलांडून कारबी अँगलाँगमध्ये जात आहेत. या अभयारण्याला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. त्यामुळे मोठे नुकसान होते. काझीरंगातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील हलक्या वजनाच्या वाहनांची वाहतूक नागाव जिल्हा प्रशासनाने तात्पुरती थांबविली आहे. अभयारण्यातील प्राणी महामार्ग ओलांडून ज्या मार्गाने कारबी अँगलाँगला जात आहेत त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिरिक्त १०० वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. या प्राण्यांना विनाअडथळा तेथून जाता यावे व तसेच गेंड्यांसह इतर प्राण्यांची कोणी अवैध शिकार करू नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. याच मार्गावरून जाताना काही प्राणी मरण पावले आहेत. (वृत्तसंस्था)>मोठ्या संख्येने गेंडे, रानम्हशी अडकल्याआसाम सरकारचे जलस्रोत खात्याचे मंत्री केशब महंत यांनी सांगितले की, काझीरंगा अभयारण्यामध्ये असलेल्या उंच ठिकाणांमुळे तेथील प्राण्यांचा जीव बचावण्यास मदत झाली आहे. तेथील परिस्थितीवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहे व लागेल ती मदत तात्काळ पुरविण्यात येत आहे. काझीरंगा अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापुरामुळे या अभयारण्यात मोठ्या संख्येने गेंडे व रानम्हशी अजूनही अडकलेल्या आहेत.>आसामला सर्वतोपरी मदत : मोदीगुवाहाटी : आसाममधील सध्याच्या पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्यात पूर आणि दरडी कोसळून १५ जणांचे प्राण गेले असून, ४६ लाख लोकांना फटका बसला आहे.राज्यातील ३० जिल्ह्यांतील पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती सोनोवाल यांनी मोदी यांना दिली, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे. आसामच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अधिकाºयाने सांगितले की, सोमवार दुपारपर्यंत ४,१७५ खेड्यांतील ४६.२८ लाख लोकांना व जवळपास ९० हजार हेक्टर्सवर शेतजमिनीला फटका बसला आहे. काही शेतात तर पीकही उभे होते. पूरग्रस्त भागात लोकांना मदत आणि साह्यासाठी सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांत लष्करालाही बोलावले आहे. १० लाखांपेक्षा जास्त प्राण्यांनाही पुराचा फटका बसला आहे.

टॅग्स :floodपूर