शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

‘काझीरंगा’त पाणी शिरले; २३ प्राण्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:53 IST

आसाममध्ये महापुरामुळे ४३० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील ९० टक्के भागात पाणी शिरले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये महापुरामुळे ४३० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील ९० टक्के भागात पाणी शिरले आहे. गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील सर्व प्राणी या जलप्रलयापासून जीव बचावण्याकरिता उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत. मात्र, या प्रयत्नात शनिवारपासून आतापर्यंत २३ प्राणी मरण पावले आहेत.आसाम आणि बिहारमध्ये पुराने कहर केला असून पूर आणि संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात मुसळधार पावसाने आतापर्यंत १४ लोकांचा बळी घेतला आहे.सुरक्षित जागी जाण्यासाठी प्राणी करत असलेला प्रवासही धोकादायक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७ चा सुमारे ६० किमीचा पट्टा हा काझीरंगा अभयारण्यातून जातो. या महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला उंच ठिकाणी कारबी अँगलाँगचा जिल्ह्याचा परिसर आहे. काझीरंगातील हत्ती, हरणे मोठ्या संख्येने हा महामार्ग ओलांडून कारबी अँगलाँगमध्ये जात आहेत. या अभयारण्याला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. त्यामुळे मोठे नुकसान होते. काझीरंगातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील हलक्या वजनाच्या वाहनांची वाहतूक नागाव जिल्हा प्रशासनाने तात्पुरती थांबविली आहे. अभयारण्यातील प्राणी महामार्ग ओलांडून ज्या मार्गाने कारबी अँगलाँगला जात आहेत त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिरिक्त १०० वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. या प्राण्यांना विनाअडथळा तेथून जाता यावे व तसेच गेंड्यांसह इतर प्राण्यांची कोणी अवैध शिकार करू नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. याच मार्गावरून जाताना काही प्राणी मरण पावले आहेत. (वृत्तसंस्था)>मोठ्या संख्येने गेंडे, रानम्हशी अडकल्याआसाम सरकारचे जलस्रोत खात्याचे मंत्री केशब महंत यांनी सांगितले की, काझीरंगा अभयारण्यामध्ये असलेल्या उंच ठिकाणांमुळे तेथील प्राण्यांचा जीव बचावण्यास मदत झाली आहे. तेथील परिस्थितीवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहे व लागेल ती मदत तात्काळ पुरविण्यात येत आहे. काझीरंगा अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापुरामुळे या अभयारण्यात मोठ्या संख्येने गेंडे व रानम्हशी अजूनही अडकलेल्या आहेत.>आसामला सर्वतोपरी मदत : मोदीगुवाहाटी : आसाममधील सध्याच्या पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्यात पूर आणि दरडी कोसळून १५ जणांचे प्राण गेले असून, ४६ लाख लोकांना फटका बसला आहे.राज्यातील ३० जिल्ह्यांतील पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती सोनोवाल यांनी मोदी यांना दिली, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे. आसामच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अधिकाºयाने सांगितले की, सोमवार दुपारपर्यंत ४,१७५ खेड्यांतील ४६.२८ लाख लोकांना व जवळपास ९० हजार हेक्टर्सवर शेतजमिनीला फटका बसला आहे. काही शेतात तर पीकही उभे होते. पूरग्रस्त भागात लोकांना मदत आणि साह्यासाठी सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांत लष्करालाही बोलावले आहे. १० लाखांपेक्षा जास्त प्राण्यांनाही पुराचा फटका बसला आहे.

टॅग्स :floodपूर