शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

धो क्या ची नां दी !

By admin | Updated: June 14, 2015 02:35 IST

भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये जाऊन बंडखोर गनिमांचा खात्मा केला. ही कारवाई म्हणजे लष्कराने रचलेल्या डावपेचांचे यश होते.

- पवन देशपांडे

भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये जाऊन बंडखोर गनिमांचा खात्मा केला. ही कारवाई म्हणजे लष्कराने रचलेल्या डावपेचांचे यश होते. या कारवाईने कुरापतखोर शेजारी राष्ट्र हादरले आणि तेथील नेत्यांनी भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली. लष्कराची कामगिरी स्तुत्यच होती. देशभरात त्याचे कौतुकही झाले. हे सारं घडून त्याच्या यशाचा विजयोत्सव भारतात शमलेला नसतानाच एक धोक्याची नांदी मिळाली. काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांनी काढलेल्या रॅलीमध्ये इराक आणि सिरियामध्ये रक्ताचे थैमान घालणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकले. घटना छोटी दिसत असली तरी इसिससारखी घातक संघटना भारतात रुजतेय ही बाब यावरून स्पष्ट होते.काश्मीर खोरे फुटीरवाद्यांनी कायमच धुमसत ठेवले आहे. तेथे कधीच शांतता पसरू न देणे हे त्यांचे पहिले कार्य. कधी पाकिस्तानचे झेंडे फडकवले तर कधी दंगली घडवून आणल्या. कधी पोलिसांवर, सुरक्षारक्षकांवर दगडफेक करून पाकिस्तानी अतिरेकी वृत्तीला खतपाणी घातले. त्यात पाकिस्तानही सातत्याने घुसखोरी करून धरतीवरील हे नंदनवन अशांत करून ठेवत आहे. सीमेपार तळ ठोकून असलेल्या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनी काश्मिरातील अनेक तरुणांना फूस लावून देशविरोधी कृत्य करण्यासाठी माथे भडकवण्याचे सातत्याने काम केले आहे. त्यामुळेच फुटीरवाद्यांच्या रॅलीमध्ये अनेकदा पाकिस्तानी झेंडे फडकल्याचे दिसून आले आहे. इसिसचा झेंडा भारतीय भूमीवर फडकण्याची घटना पुन्हा एकदा काश्मिरातच घडली. हे धोक्याचे लक्षण आहे. यापूर्वी गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात काश्मीरमधील अशाच रॅलीत इसिसचे झेंडे फडकले होते. शुक्रवारी त्याची पुनरावृत्ती झाली. काश्मिरात इसिसचे पाय घट्ट होण्यास सुरुवात झाल्याचे हे भयसूचक चिन्ह आहे. गेल्या महिन्यात कराचीमध्ये इसिस दहशतवाद्यांनी ४५ जणांचा बळी घेतला होता. भारतीय भूमीवर येण्यास त्यांना वेळ लागणार नाही, अशी भीती साऱ्यांनीच त्या वेळी व्यक्त केली होती. दुसऱ्यांना इसिसचा झेंडा फडकण्याची घटना घडल्यानंतर आता ही भीती खरी ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.अनेक भारतीय तरुणांना इसिसने आपल्या जाळ्यात ओढल्याचे उघडकीस आलेले आहे. कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये इसिससाठी लढले, त्यातील एक जण आता भारताच्या ताब्यात आहे. इसिसचे टिष्ट्वटर हँडल करणारा इंजिनीअर बंगलुरूमधून ताब्यात घेण्यात आला होता. त्याचे तर तब्बल १७ हजार फॉलोअर्स होते. त्यात भारतातील सर्वाधिक फॉलोअर्स. सोशल माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना जिहादकडे खेचण्याचे काम मोठ्या प्रमाणावर दिसून येते. जग जिंकायचं आणि सारी पृथ्वी इस्लामिक बनवायची अशा मनसुब्यांनी निष्पाप जिवांच्या रक्ताचा सडा टाकत सुटलेली इसिस ही संघटना दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. कुर्दीश संघटनेच्या मते इराक आणि सिरियामध्ये इसिसकडे सुमारे २ लाख जिहादी तरुणांची फौज आहे. अमेरिकेच्या सीआयए या तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, इसिसकडे २० ते ३० हजार तरुणांची फौज आहे. याशिवाय इराक आणि सिरियाबाहेर एवढीच फौज कार्यरत असल्याचा अंदाज आहे. ही संघटना केवळ इराक आणि सिरियापुरतीही मर्यादित राहिलेली नसून जगभरात विस्तारत चालली आहे. भारतात त्याची अनेकदा नांदी मिळाली आहे. आतापर्यंत इसिसचे भारतात २० दहशतवादी असल्याची आकडेवारी आहे. पण ती वाढत जाणार ही भीती आहेच. आता आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेची खरी कसोटी आहे. भारतीय तरुणांना फूस लावून इराक-सिरियात ट्रेनिंगसाठी घेऊन जाण्याआधीच अशा स्लिपर सेलचा आणि माथे भडकावू अतिरेक्यांचा शोध लावावा लागणार आहे. अन्यथा ही दहशतवादी संघटना भारताच्या भूमीतही निष्पाप जिवांचा बळी घेत सुटेल. इसिसचे काळे झेंडे फडकवणारे कदाचित हेच सुचवू पाहात असतील. भारतात घुसण्याचा रोड‘मॅप’इसिसने काही दिवसांपूर्वी पाच वर्षांचा प्लॅन तयार केल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण जग काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यासाठी त्यांनी एक ‘मॅप’ही तयार केला आहे. या मॅपमध्ये भारताचा बराच भाग आहे. हा भाग पाकिस्तानच्या सीमेशी निगडित आहे; आणि पाकिस्तानात सध्या ५००हून अधिक इसिसचे दहशतवादी असल्याचा अंदाज आहे. यावरूनच सिद्ध होतं की ही सारी घुसखोरी पाकिस्तानच्या भूमीतून होणार. ते रोखण्यासाठी भारतीय लष्कराला कायम सतर्क राहावे लागणार आहे.