शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:44 IST

मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ९० डिग्री पूल देशभरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ९० डिग्री पूल देशभरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. हे प्रकरण आता थेट उच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे. भोपाळच्या ऐशबाग परिसरात बांधण्यात आलेल्या या पुलाच्या तपासणीचा रिपोर्ट आता कोर्टात सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये एका तज्ज्ञांने या पुलाबद्दल अजब खुलासा केला आहे. ऐशबागचा हा पूल ९० डिग्री नसून, ११९ डिग्रींचा असल्याचा दावा या तज्ज्ञाने केला आहे. या रिपोर्टनंतर आता हा पूल बांधणाऱ्या कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याच्या आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी सरकारने वेळ मागितला आहे.

भोपाळच्या या पुलाचा हा रिपोर्ट मौलाना आझाद आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी तयार केला आहे. हा रिपोर्ट मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला.

कंपनीला करण्यात आले होते ब्लॅक लिस्टेड

या पुलाबाबत वाद सुरू होताच तो बांधणाऱ्या कंपनीवर बंदी घालण्याचा निर्णय मध्यप्रदेश सरकारने घेतला होता. मात्र, आता या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी सरकारने वेळ मागितला आहे. मात्र, कोर्टाने आपला निर्णय कायम ठेवला आहे. सरकारच्या निर्णयानंतर पूल बांधणाऱ्या कंपनीने कोर्टाचे दार ठोठावले होते. यानंतर कोर्टाने तज्ज्ञांकडून अहवाल मागवला होता.

याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयात दावा केला की, त्यांना २०२१-२२ मध्ये ऐशबागमध्ये उड्डाणपूल बांधण्याचे कंत्राट मिळाले होते. पूल बांधण्याचा आराखडा एका सरकारी संस्थेने जारी केला होत. काही कारणास्तव त्या पुलाचे काम झटपट १८ महिन्यांत पूर्ण करायचे होते. तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, सरकारने दिलेल्या अहवालात पुलाचा कोन ११९ डिग्री आहे, तर जागेवर मोजले असता, जवळपास समान भरला आहे.

पीडब्ल्यूडी मंत्र्‍यांनीही केलेले समर्थन

सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह यांनी या ९० अंशाच्या पुलाचे समर्थन केले होते. त्यांनी म्हटले होते की ९० अंशाचा पूल असण्यात काहीही गैर नाही. असे पूल अनेक देशांमध्ये आहेत. जर जुन्या शहरात पूल किंवा रस्ता बांधायचा असेल, तर तिथे जागा नाही, म्हणून अशा प्रकारचा पूल बांधावा लागेल. ऐशबागमध्ये बांधलेला पूल ९० अंशांचा नाही तर ११८ अंशांचा आहे.

मग कंपनीवर कोणत्या आधारावर कारवाई करण्यात आली?

आता प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा पूल बांधणाऱ्या कंपनीने सर्व नियमांचे पालन केले, तेव्हा त्यावर कोणत्या आधारावर कारवाई करण्यात आली? अधिकाऱ्यांवर कारवाई ९० अंशाच्या पुलामुळे नाही, तर रेल्वेशी समन्वयाच्या अभावामुळे करण्यात आली होते, असे उत्तर मंत्री राकेश सिंह यांनी दिले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfraudधोकेबाजी