शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आरोग्यदूतांकडून वारकऱ्यांची सेवा, वारीत जागेवर मिळणार उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:23 IST

पायी वारीत वारक-यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून, या वर्षीपासून आरोग्य विभागाकडून पहिल्यांदा ‘आरोग्यदूत’ सज्ज होणार आहेत.

पुणे - पायी वारीत वारक-यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून, या वर्षीपासून आरोग्य विभागाकडून पहिल्यांदा ‘आरोग्यदूत’ सज्ज होणार आहेत. या आरोग्यदूताच्या माध्यमातून वारक-यांना त्यांच्या जागेवर येऊन प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी दिली.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जवळ आला आहे. सोहळ्यातील वारकरी आणि भाविक यांना आरोग्य, पाणी, स्वच्छता या सेवा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाकडून सर्व नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक विभागाला त्यांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.दरवर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून वारकºयांची आरोग्यसेवा देण्यासाठी औषधांचे किट वाटप करण्यात येते. यात ठिकठिकाणी रुग्णवाहिका उभारण्यात येणार आहे. मात्र, पालखी मुक्काम किंवा विसाव्याच्या ठिकाणी एखाद्या आजारी व्यक्तीला रुग्णवाहिका शोधत त्या ठिकाणी यावे लागते. त्यामुळे वारकरीही उपचार घेण्यास टाळाटाळ करतात आणि आजार अंगावर काढतात. हे टाळण्यासाठी आणि वारकºयांना आहे त्या ठिकाणी वेळेत औषधोपचार मिळावे, प्रत्येक वेळी रुग्णवाहिका शोधावी लागू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून ‘आरोग्यदूत’ नेमण्यात आले आहे.दोन्ही पालखीमार्गासाठी एकूण ३० आरोग्यदूत नेमण्यात आले आहे. ते दुचाकीवरून पालखी सोहळ्यात वारकºयांना जागेवर जाऊन आरोग्यसेवा देणार आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडे प्राथमिक उपचाराचे सर्व साहित्य असणार आहे. यांचा ड्रेसकोड असणार आहे.आरोग्यदूत, ब्लड चेक करणे, ताप, सर्दी, खोकला असल्यास त्यांची तपासणी करून औषध देणे तसेच जखम झाल्यास त्यावर उपचार या सेवा पुरविणार आहेत. त्यांना एक दुचाकी आणि आवश्यक ती औषधे आणि वैद्यकीय उपकरणे देण्यात येणार आहेत. दोन्ही पालखी सोहळ्यांसाठी प्रत्येकी १५ आरोग्यदूत असणार आहेत.- डॉ. दिलीप मानेआरोग्याधिकारी,जिल्हा परिषद पुणे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या