शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

अपुरा निधी व जागेच्या कमतरतेमुळे वर्धा-नांदेड-यवतमाळ रेल्वेमार्गास विलंब

By admin | Updated: December 6, 2014 00:14 IST

अपुरा निधी व जागेच्या कमतरतेमुळे वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाला विलंब होत असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली.

नवी दिल्ली : अपुरा निधी व जागेच्या कमतरतेमुळे वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाला विलंब होत असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. ते म्हणाले, २८४ किलोमीटरच्या या मार्गावरील ३४ किलोमीटर भूमी अधिग्रहीत केली असून, सध्या वर्धा- यवतमाळ पट्ट्यातील पुलांची कामे सुरू झाली आहेत. खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत शुक्रवारी, वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाच्या प्रगतीसोबतच मार्ग केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न विचारला होता. रेल्वे राज्यमंत्री सिन्हा उत्तरात म्हणाले, की या मार्गाची अधिकृत घोषणा २००८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात केली होती. वर्धा- नांदेड- यवतमाळ -पुसद या नव्या मार्गाचे काम रेल्वे राज्य सरकारच्या ६०-४० टक्के भागीदारीत २००८-२००९ मध्ये सुरू झाले. ६९७ कोटी रूपयांच्या आराखड्याला मान्यता दिली होती. प्रत्यक्षात मात्र, मार्च २०१४ पर्यंत ६७ कोटी रूपये खर्च करण्यात आले. २०१४-१५ यावर्षात १५ कोटींची तरतूद करण्यात आली. निधीच्या कमतरतेसोबतच जागा उपलब्ध नसल्याने वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाला विलंब होत असून, या योजनेचा सध्याचा अपेक्षित खर्च २५०० कोटी आहे. जागेच्या दरात मोठी वाढ झाल्याने भूमीसंपादनाचा मोठा खर्च येत आहे, असे सांगून सिन्हा यांनी स्पष्ट केले, कमतरतेअभावी सर्व योजनांना नियमित आधारावर पुरेसा निधी देणे शक्य होणार नाही. त्यामुळÞे या योजनेच्याही कालबध्दतेसाठी सध्याच अंदाज व्यक्त करणे शक्य नाही. (विशेष प्रतिनिधी)

अपेक्षित खर्चात वाढ : दर्डा यांच्या प्रश्नावर रेल्वे राज्यमंत्र्यांचे उत्तर